पिंपरी चिंचवड : मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटी ते मुंबई अशी पदयात्रा सुरू आहे. त्यांचा पाचवा दिवस हा पुण्यात गेला तर सहाव्या दिवसाची सुरुवात आणि अख्खी रात्र पिंपरी- चिंचवड शहरात गेली आहे. ठिक- ठिकाणी स्वागत होत आहे. मनोज जरांगे यांचं डांगे चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळ पहाटे चारच्या सुमारास आगमन झालं. सर्व मराठयांनी २६ जानेवारी रोजी मुंबईला यावं असं आवाहन करत गेली दोन दिवस झाले सतत बोलत असल्याने माझा आवाज कमी झाला आहे. पण, लेकरांसाठी संघर्ष असून हा शेवटच्या टप्प्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा : जरांगे यांची पदयात्रा पिंपरी-चिंचवडमध्ये

Sharad PAwar
“दिवट्या आमदार…”, पुण्यातील आमदारावर शरद पवारांची टीका; म्हणाले, “राष्ट्रवादीच्या नावाने…”
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
After 75 years of independence ST bus started for the first time in Naxal-affected Gardewada
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनतर नक्षलग्रस्त गर्देवाडात ‘लालपरी’ अवतरली; गावात पहिल्यांदाच…
manoj jarage patil pc
“देवेंद्र फडणवीसांना ही शेवटची संधी, त्यानंतर…”; आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा!
Devendra Fadnavis on Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरलेल्या अर्जाचे पैसे कधी येणार? लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीसांनी दिली माहिती
MHADA Mumbai, applications house MHADA,
म्हाडा मुंबई मंडळ सोडत : एका घरासाठी अंदाजे ५३ अर्ज; अर्ज विक्री – स्वीकृतीची मुदत संपुष्टात
Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana
Aditi Tatkare : लाडकी बहीण योजनेसाठी सप्टेंबरमध्ये अर्ज भरलेल्या महिलांना पैसे कधी मिळणार? आदिती तटकरे म्हणाल्या…
Preparation of 204 artificial ponds for Ganesh immersion Municipal Corporation complete
मुंबई : गणेश विसर्जनासाठी २०४ कृत्रिम तलाव, महापालिकेची तयारी पूर्ण

मनोज जरांगे पाटील म्हणाले, सलग दोन दिवस बोलत असल्याने माझा आवाज कमी झाला आहे. माझा आवाज पण निघत नाही. तुम्हाला विनंती आहे की, आपल्या लेकरांसाठी हा संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष शेवटच्या टप्प्यात आला आहे. मावळातील सर्व मर्द मावळ्यांनी २६ जानेवारीला मुंबईत यावं. आरक्षणाची शर्यत जिंकायची आहे. पुढे ते म्हणाले, महाराष्ट्रातील मराठ्यांसाठी लढतो आहोत. आपण सर्व जण एकत्र लढू, समाजाला पाठबळ देण्याची हीच वेळ आहे. तुम्ही सर्व मुंबई ला या. अस आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे. जरांगे यांची लोणावळ्यात जाहीर सभा होणार असून तिथे ते कोणावर निशाणा साधतात हे बघावं लागेल.