पुणे : लोकसभा निवडणुकीत झालेली चूक लक्षात आली आहे. ती चूक विधानसभेला होणार नाही, असे सांगत आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला २०० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास चंद्रशेखर बावनकळे यांनी येथे व्यक्त केला.

हेही वाचा : पुणे: महाअधिवेशनात नितीन गडकरी यांच्या अनुपस्थितीची चर्चा

maharashtra BJP
Maharashtra BJP : लोकसभेतील अपयशानंतर भाजपाची महाराष्ट्रात पिछेहाट? आता विधानसभेसाठी ठेवलं फक्त १०० जागांचं लक्ष?
5th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
५ सप्टेंबर पंचांग: गुरुवारी १२ पैकी कोणत्या राशीवर बरसणार स्वामींची कृपा? दुःख-संकट दूर तर प्रचंड धनलाभ होणार; वाचा तुमचे भविष्य
Ladki Bahin Yojana, women candidates, assembly elections, mahayuti, Eknath Shinde, Devendra Fadnavis, Nagpur, political pressure, maha vikas aghadi, Congress, BJP, women empowerment,
लखपती दीदी, लाडकी बहीण खूप झाले, उमेदवारीचे बोला! राजकीय पक्षांवर…
sharad rao s union boycotts committee election
शरद रावांच्या संघटनेचा फेरीवाला निवडणुकीवर बहिष्कार, दिवंगत कामगार नेते शरद राव, २९ ऑगस्टच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष
Loksatta karan rajkaran Who is the alternative to Sunil Kedar for assembly election 2024  in Savner constituency
कारण राजकारण: सावनेरमध्ये केदार यांना पर्याय कोण?
Ajit pawar and Jay Pawar
Baramati Jay Pawar: ‘बारामतीमधून निवडणूक लढण्यात रस नाही’, मुलगा जय पवारच्या उमेदवारीबाबत अजित पवारांचे मोठं विधान
Will work for Kisan Kathore in Vidhana Sabha says former minister Kapil Patil
“विधानसभेला किसन कथोरेंचे काम करणार”, माजी मंत्री कपिल पाटलांचा नरमाईचा सूर; “मागे कुणी काय केले ते गौण…”
2500 applications to Congress for assembly elections Most aspirants from Vidarbha Marathwada for candidature
काँग्रेसकडे अडीच हजार अर्ज; उमेदवारीसाठी विदर्भ, मराठवाड्यातून सर्वाधिक इच्छुक

भाजपचे पुण्यात प्रदेश महाअधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनात चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत ६० जागा अल्पमतांनी गमवाव्या लागल्याचे सांगून चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, की मंत्रालयावर भगवा फडकावयाचा आहे. प्रत्येक बूथवर दहा मतांची गरज आहे. अधिवेशनातून बाहेर पडल्यानंतर प्रत्येकाने दहा ते पंचवीस मतदार वाढवा. नव्याने मतदार नोंदणी करा. मला काय मिळेल, याचा विचार न करता जागा वाटपाचा निर्णय महायुतीत होईल. राज्यातील १४ कोटी जनतेला देण्यासाठी काम करा. माझा विश्वास आणि श्रद्धा तुमच्यावर आहे. तुम्ही हे कराल आणि महायुती २०० चा आकडा पार करेल. ही घमेंड नाही तर विश्वास आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.