लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: अ‍ॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचे गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी गुलटेकडी मार्केट यार्डातील फळे-भाजीपाला विभाग बंद ठेवून निषेध करण्यात आला. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनसह बाजार आवारातील विविध संस्था आणि संघटनांनी केलेल्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याने बंद यशस्वी झाला. त्याचा परिणाम म्हणून महात्मा फुले मंडईमध्ये नागरिकांना भाजी मिळणे दुरापास्त झाले होते.

pune md drugs marathi news
पुणे : गुन्हे शाखेकडून २५ लाखांचे अमली पदार्थ जप्त; मेफेड्रोन, गांजा विक्री प्रकरणात तिघे अटकेत
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Mumbaikars supplied with only clean disinfected water claims mumbai municipal administration
मुंबईकरांना निर्जंतुकीकरण केलेल्या स्वच्छ पाण्याचाच पुरवठा, महापालिका प्रशासनाचा दावा
Torres Scam Case, High Court, police, Torres Scam,
टोरेस घोटाळा प्रकरण : कार्यतत्परतेत पोलिसांकडून कसूर, पोलिसांच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाचे पुन्हा ताशेरे
MLA hemant Rasane treatment Guillain Barre syndrome patients
गुइलेन बॅरे सिंड्रोम रुग्णांवर उपचारांसाठी आमदार रासने यांची मोठी मागणी, म्हणाले…!
pimpri chinchwad police commissioner vinay kumar choubey on illegal money lending
पिंपरी : अवैध सावकारी करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई; पोलीस आयुक्तांचा आदेश
Fraud of 13 lakhs , fear of action, Pune, Fraud,
पुणे : कारवाईची भीती दाखवून महिलेची १३ लाखांची फसवणूक
Anti plastic campaign Mumbai Municipal Administration seizes 61 kg of plastic in a single day Mumbai news
प्लास्टिक विरोधी मोहीम पुन्हा एकदा तीव्र,एकाच दिवसात ६१ किलो प्लास्टिक जप्त, १ लाख ४५ रुपयांचा दंड वसूल

श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध ऊर्फ बापू भोसले म्हणाले की, बाजार समिती आवारात कोणताही परवाना न घेता बेकायदेशीररित्या अतिक्रमण करून लिंबाची विक्री अनेक महिलांकडून सुरू होती. या लिंबू विक्रीमुळे बाजार आवारात वाहतूककोंडी होत होती. या विरोधात बाजार समिती प्रशासनाने पोलिसांच्या सहकार्याने अवैध लिंबू विक्रेत्यांवर कारवाई केली. मात्र, ही कारवाई सुरू असताना अथवा कारवाई झाल्यानंतर कोणतीही तक्रार, गुन्हा अधिकाऱ्यांवर दाखल झाला नाही.

हेही वाचा… पुणे: अवैध विक्रेते, फेरीवाल्यांवर रेल्वेने उगारला दंडुका

मात्र, लिंबू विक्रेते पूर्णपणे बंद केल्यानंतर तब्बल सहा महिन्यांनंतर या प्रकरणी अधिकारी, अडते यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले. ही अन्यायकारक गोष्ट असून भविष्यात खोट्या गुन्ह्यांच्या भीतीने कोणतीही कारवाई होणार नाही. त्यामुळे बाजार समिती अधिकारी, कर्मचारी, बाजार घटकांनी व्यथा मांडत दाखल झालेले गुन्हे रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे केली आहे. तसेच बाजारातील अडते, टेम्पो, कामगार, तोलणार आदी सर्व संघटनांनीदेखील गुन्हे मागे घेण्याबाबत पुणे पोलीस आयुक्तांना निवेदन दिले. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी बाजार घटकांनी बाजार बंद ठेवत निषेध व्यक्त केला.

Story img Loader