पुणे : खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढले आहे. गेल्या बारा तासांमध्ये धरणांमध्ये पुणे शहराला १५ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून ११ हजार ४०७ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे पुन्हा मुठा नदीकाठच्या नागरिकांना जलसंपदा विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांकडून अजित पवारांवर कुरघोडी? पुणे जिल्ह्यातील महसूल कार्यालयांच्या अचानक तपासणीचा आदेश

Khadakwasla Dam, Releasing water Khadakwasla Dam,
पुणे : खडकवासला धरणातून पुन्हा पाणी सोडण्यास सुरुवात
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Nitin Gadkari, Wardha, Raksha Bandhan, charity, Smita Kolhe Ties Rakhi to nitin gadkari
बहिणीने राखी बांधली; पण मंत्री असलेल्या भावाकडे ओवाळणीसाठी पैसेच नव्हते, मग…
constable commits suicide marathi news
पुणे: महिला पोलीस शिपायाची इंद्रायणी नदीत उडी; तरुणाने वाचवण्याचा प्रयत्न केला पण…
forecast of the Meteorological Department there is a possibility of heavy rain in some parts of Maharashtra Nagpur
राज्यात पावसाचा जोर वाढणार, हवामान खाते…
anganwadi worker cross the flooded river video goes viral
Video : पूर आलेली नदी ओलांडण्यासाठी अंगणवाडी सेविकेने काय केले?
Ajit Pawar Ladki Bahin News
Ajit Pawar : अजित पवारांनी आधी हात जोडले, मग डोक्यावर हात ठेवत लाडक्या बहिणीला म्हणाले, “व्वा गं माझी मैना”
Stormy rain in Satara city
सातारा शहरात ढगफुटीसदृश वादळी पाऊस

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणात मिळून बुधवारी सकाळी सहा वाजेपर्यंत ८८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मंगळवारी रात्रीपासून बुधवारी सकाळपर्यंत टेमघर धरणाच्या परिसरात ९५ मिलिमीटर, वरसगाव धरणक्षेत्रात ६६ मि.मी., पानशेत धरण परिसरात ६९ मि.मी. आणि खडकवासला धरणक्षेत्रात ११ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. सध्या धरणांमध्ये २५.७८ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ८८.४४ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. वरसगाव धरणातून वीजनिर्मितीसाठी ६०० क्युसेक, पानशेत धरणातून वीजनिर्मितीसाठी ६०० क्युसेक, तर खडकवासला धरणात १९४२ क्युसेकने आणि खडकवासला धरणातून मुठा नदीत ११ हजार ४०७ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. धरणांच्या परिसरात असाच पाऊस कायम राहिल्यास पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.