पुणे: पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलीस शिपायाने आळंदीतील इंद्रायणी नदीत उडी मारली आहे. ही घटना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली असल्याची माहिती आळंदी पोलिसांनी दिली आहे. अनुष्का केदार (वय- २० वर्षे) असे इंद्रायणी नदीत उडी मारलेल्या महिला पोलीस शिपायाचे नाव आहे.

हेही वाचा : “महायुतीमध्ये आमच्यावर अन्याय, विधानसभेला बारा जागा हव्या”, कोणी केली मागणी?

Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Really last digit of your mobile number tell about your nature and personality
तुमच्या मोबाईलचा शेवटचा अंक खरंच सांगतो तुमचा स्वभाव? सोशल मीडियावर VIDEO चर्चेत
Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
anganwadi worker cross the flooded river video goes viral
Video : पूर आलेली नदी ओलांडण्यासाठी अंगणवाडी सेविकेने काय केले?
Nitin Gadkari, Wardha, Raksha Bandhan, charity, Smita Kolhe Ties Rakhi to nitin gadkari
बहिणीने राखी बांधली; पण मंत्री असलेल्या भावाकडे ओवाळणीसाठी पैसेच नव्हते, मग…
What Supriya Sule Said About Ajit Pawar ?
Supriya Sule : ‘अजित पवारांना राखी बांधणार का?’ विचारताच सुप्रिया सुळे हसल्या आणि म्हणाल्या, “मी आज..”

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुष्का केदार या पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत आहेत. सध्या त्या पुणे ग्रामीण मुख्यालय येथे नेमणुकीस आहेत. दिघी- वडमुखवाडी या ठिकाणी राहणाऱ्या अनुष्का यांनी साडेपाचच्या सुमारास चाकणकडे जाणाऱ्या पुलावरील गरुड खांबापासून इंद्रायणी नदीत उडी घेतली. हे बघताच तिथे उपस्थित असलेल्या तरुणाने देखील त्यांना वाचवण्यासाठी उडी घेतली. परंतु, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने अनुष्का वाहून गेल्या अशी माहिती आळंदी पोलिसांनी दिली आहे. अनुष्का यांचा अग्निशमन दल शोध घेत आहेत. अनुष्का यांनी त्यांच्या खासगी जीवनातील वैयक्तिक कारणामुळे असं टोकाचं पाऊल उचलल्याची भीती पोलिसांकडून वर्तवली जात आहे. आळंदी पोलीस अधिक तपास करत आहेत.