पुणे : एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत. हा सामना जिंकून भारतीय संघाला तिसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याची संधी आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा जगज्जेता होण्याचा प्रयत्न करेल. दोन्ही संघ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात २० वर्षांनी आमनेसामने आले आहेत. यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया २००३ मध्ये विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचले होते, त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर मात केली होती.

हेही वाचा : सात वर्षांच्या बालिकेवर अत्याचार; रिक्षाचालक गजाआड

अग्रलेख : आहे बहुमत म्हणून…?
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
controversy over dhirendra shastri moksha remark
उलटा चष्मा:मोक्ष मिळवून दिला जाईल!
Rahul Gandhi Critized Mohan Bhagwat
Rahul Gandhi : राहुल गांधींनी लोकसभेत मोहन भागवतांचं नाव घेताच गदारोळ; म्हणाले, “आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं स्वप्न…”
Rohit Sharma Viral Video of BCCI Awards on Smriti mandhana Question
VIDEO: “माझी बायको बघत असेल…”, विसरभोळ्या रोहित शर्माचं स्मृती मानधनाच्या प्रश्नावर भलतंच उत्तर; नेमकं काय घडलं?
Maharashtra Breaking News Live Updates in Marathi
Maharashtra Breaking News Updates : नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण, बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कोणाला पाठिंबा…”
Modi touches Patparganj candidate feet
Video: पंतप्रधान मोदींनी तरुण उमेदवाराला तीन वेळा केला वाकून नमस्कार; कारण काय?
Protest by a pro-Khalistan mob outside the Indian High Commission in London met counter-protest
Video : लंडनमध्ये खलिस्तान समर्थकांना भारतीयांनी दिलं सडेतोड उत्तर; भारतीय दूतावासाबाहेर निदर्शनं सुरू होताच…

आता भारतीय संघाकडे या पराभवाचा बदला घेण्याची सुवर्ण संधी आली आहे. तर या अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात क्रिडा प्रेमींमध्ये प्रचंड उत्साह पाहण्यास मिळत आहे. त्याच दरम्यान आज पुण्यातील कोथरूड भागातील मनसेचे नेते किशोर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि विक्रमवीर विराट कोहली यांच्या पोस्टरला मनसैनिकांनी दुग्धाभिषेक करीत भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या.

तर यावेळी कोथरूड विभागाचे मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष शशांक अमराळे म्हणाले की, आपल्या परंपरेत चांगल्या कामाची सुरुवात मंदिरामध्ये जाऊन पूजा, प्रार्थना, दुग्धभिषेक करून केली जाते. त्या प्रमाणेच आज आपल्या सर्वांच्या दृष्टीने आनंदाचा दिवस आहे. क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आपण पोहोचलो असून ऑस्ट्रियालाचा निश्चितच पराभव करू, तसेच या देखील सामन्यात विराट कोहली शतक मारेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Story img Loader