पुणे : लाडक्या गणरायाचे स्वागत करण्याच्या उद्देशातून पूजा साहित्य आणि सजावट करण्याचे साहित्य खरेदीसाठी शहराच्या मध्य भागात शुक्रवारी गर्दी झाली होती. धरणातून पाणी सोडल्यामुळे नदीपात्रातील रस्ता बंद ठेवण्यात आल्यामुळे वाहतूक कोंडीमध्ये भर पडली. वैभवशाली गणेशोत्सवास शनिवापासून सुरुवात होत आहे. गुरुवारी रात्री मुसळधार पाऊस झाल्यानंतर शुक्रवारी सकाळपासून पावसाने उघडीप घेतली. त्यामुळे लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी पूजा साहित्य, सजावट करण्याचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिक घराबाहेर पडले. पूजा साहित्याच्या खरेदीसाठी मंडई, शनिपार, हुतात्मा बाबू गेनू चाैक परिसर तर सजावटीचे साहित्य खरेदीसाठी बोहरी आ‌ळी, बुधवार पेठ येथील इलेक्ट्रिक वस्तूंची बाजारपेठ अशी शहराच्या मध्य भागात गर्दी झाली होती. हरतालिकेचा उपवास असल्याने गृहिणींसह अनेकजण खरेदीसाठी घराबाहेर पडले होते. खरेदी करताना एकजण वाहनावर बसून असल्याने वाहतूक कोंडीमध्ये भर पडली होती.

हेही वाचा : “ईट का जबाब पत्थर से..”, आंदेकर खून प्रकरणानंतर पोलीस आयुक्तांकडून गुंडांना इशारा

indapur dam latest news in marathi
खडकवासला धरणसाखळीतून कालव्यात पाणी सोडण्यास विलंब; इंदापुरातील शेतीला फटका
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
boricha marg Encroachment free news
मुंबई : चिंचपोकळी परिसरातील बोरीचा मार्ग अतिक्रमण मुक्त, पालिकेच्या जी दक्षिण विभागाची कारवाई
pune sahakar nagar water supply cut
पुणे : शहरातील ‘ या ‘ भागात गुरुवारी पाणी नाही !
Kulgaon Badlapur municipal news in marathi
वृत्तपत्र विक्रेत्यांवर कारवाई होणार नाही; बदलापूर मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन, प्रेस क्लब ऑफ बदलापुरच्या मागणीला यश
pune water bill marathi news
पुणे : पुरवठ्या आधीच समाविष्ट गावांच्या पाणीपट्टीत वाढ ?
Ghodbunder water shortage in old Thane
घोडबंदरपाठोपाठ जुन्या ठाण्यातही पाणी टंचाई; पाणी समस्या सोडवाच पण, तोपर्यंत टँकरने मोफत पाणी द्या, बैठकीत मागणी
Road encroachments removed in badlapur west railway station area
बदलापुरात रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली; पूर्वेतील कारवाईनंतर पश्चिमेतही धडक कारवाई

गुरुवारी रात्री मुसळधार पाऊस झाल्यानंतर धरणातून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. त्याचा परिणाम नारायण पेठेत टिळक चाैकापासून ते आप्पा बळवंत चौकामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. अनेकांनी नदीपात्रातील रस्त्याने जाऊन खरेदी करण्याचा बेत आखला होता. मात्र, नदीपात्रातील रस्ता बंद असल्याने त्या वाहनांचाही ताण आल्याने मध्य भागामध्ये वाहतूक कोंडी झाली होती.

Story img Loader