पुणे : राज्य सरकारतर्फे दुसरे विश्व मराठी संमेलन २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च असे तीन दिवस पुण्यात आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी केली. या संमेलनासाठी आवश्यक ती तयारी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या मराठी भाषा विभागाच्या आढावा बैठकीत सामंत बोलत होते. विभागाचे सहसचिव नामदेव भोसले, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, मराठी भाषा विभागाचे अवर सचिव नितीन डंगारे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक तथा विश्वकोश निर्मिती मंडळाचे प्रभारी सचिव डॉ. शामकांत देवडे, भाषा संचालक विजया डोणीकर, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील, विभागाच्या कक्ष अधिकारी ऐश्वर्या गोवेकर या वेळी उपस्थित होत्या.

हेही वाचा : पुणे : वाघोली अपघात प्रकरणात डंपर मालक अटकेत

palghar zilla parishad latest news in marathi
पालघर : मध्यरात्रीनंतर जिल्हा परिषदेचा सांस्कृतिक कार्यक्रम थांबविणाऱ्या पोलिसांसोबत पदाधिकाऱ्यांचा वादंग
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
All-party meetings in Parliament
अर्थअधिवेशन आजपासून, पहिला टप्पा १३ फेब्रुवारीपर्यंत; अर्थसंकल्पाबाबत उत्सुकता
A protest over a local court-ordered survey of the Sambhal mosque had led to the death of five people there in November. (Source: File)
VHP : संभल वादावर विहिंपचंं सूचक मौन, काशी आणि मथुरेवर लक्ष केंद्रीत करण्याबाबत चर्चा, दोन दिवसीय बैठकीत काय ठरलं?
Loksatta chawadi Ahilyanagar uday samant State Environment Minister Shambhuraj Desai Satara
चावडी: योग्य वेळी योग्य भूमिका
tharla tar mag wedding sequence who will arjun marry sayali or priya
‘ठरलं तर मग’ मालिकेत लगीनघाई! सायली अन् प्रिया दोघींच्या हातावर सजणार मेहंदी…; अर्जुनचं लग्न कोणाशी होणार?
mahacon 2025 news update
भारतीय वास्तुविशारद संस्थेच्या महाकॉन ला सुरुवात
First-ever conference on tribal diseases in Nagpur experts from 17 countries will participate
आदिवासींच्या आजारावर प्रथमच नागपुरात परिषद… १७ देशातील तज्ज्ञ…

राज्यभाषेला अभिजात भाषेचा दर्जा असलेल्या राज्यांप्रमाणे मराठी भाषेसाठी केंद्र सरकारकडून अधिकाधिक निधी मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करावा. देशातील सर्व बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळांना आमंत्रित करून मराठी भाषेसाठी काय योगदान देता येईल, यासाठी त्यांच्या सूचना जाणून घ्याव्यात. सर्व महाविद्यालयात मराठी भाषा विभागाची प्रकाशने ठेवण्यासाठी, सर्व विद्यापीठातील मराठी भाषा विभागात मराठी भाषा संशोधन केंद्र स्थापनेसाठी प्रस्ताव करावेत, असे सामंत यांनी सांगितले. तसेच राज्यस्तरावर महिला साहित्य संमेलन, तसेच विभागनिहाय युवा साहित्य संमेलन आयोजनाची सूचनाही सामंत यांनी केली. पुस्तकांचे गाव या संकल्पनेच्या अनुषंगाने कवितांचे गाव या संकल्पनेवरही काम करण्याचे निर्देश सामंत यांनी दिले. त्यामुळे आता कवितांचे गाव साकारण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Story img Loader