पुणे : ‘विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे जगाचा आयाम बदलत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेने जग वेढले जात असताना ज्ञानाचे सर्वोच्च अधिष्ठान आपण हरवत चाललो आहोत काय,’ असा प्रश्न विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी सोमवारी उपस्थित केला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ७६व्या वर्धापन दिनानिमित्त खाशाबा जाधव क्रीडा संकुल येथे झालेल्या अभ्यंकर यांच्या हस्ते जीवसनसाधना गौरव आणि युवा गौरव पुरस्कारांसह विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्या वेळी अभ्यंकर बोलत होते. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे, माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर या वेळी उपस्थित होते. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एकनाथ चिटणीस, शिक्षणतज्ज्ञ डॉ. शां. ब. मुजुमदार, डॉ. शिवाजीराव कदम, पुरातत्त्व व मूर्ती स्थापत्यसंशोधक डॉ. गो. बं. देगलूरकर, ज्येष्ठ लेखिका डॉ. तारा भवाळकर, योगाचार्य डॉ. विश्वास मंडलिक, सामाजिक कार्यकर्त्या हेमलता बीडकर, शल्यविशारद डॉ. संजय कुलकर्णी, ज्येष्ठ सहकारतज्ज्ञ डॉ. मुकुंद तापकीर, उद्योजक आर. एन. शिंदे यांना जीवनसाधना पुरस्कार, तर अभिनेता शुभंकर एकबोटे, क्रीडापटू स्वप्नील घोसाळे, लेखक सुमितकुमार इंगळे, सामाजिक कार्यकर्ते संदीप कुसळकर यांना युवागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा