पुणे : तलाठी भरती परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांना येण्यास अवघा एक मिनीट उशीर झाल्याने पुण्यातील रामटेकडी येथील परीक्षा केंद्रात उमेदवारांना प्रवेश नाकारण्यात आला. सकाळी नऊ वाजता परीक्षा सुरू होणार असल्याने ८.४५ वाजता उमेदवारांनी येणे अपेक्षित होते. मात्र, त्यानंतर आलेल्या उमेदवारांना परीक्षा केंद्राच्या फाटकावरच अडविण्यात आल्याने उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली. रामटेकडी येथील सहयोग डिजिटल हब या खासगी परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला.

हेही वाचा : पिंपरीत पाच हजार ४५९ ठिकाणी आढळल्या डासांच्या अळ्या

Candidate sneaks into gate after arriving late at exam centre
परीक्षा केंद्रावर उशीरा पोहचली, गेट झाले बंद तरी मानली नाही हार; शेवटी विद्यार्थीनीने काय केले? पाहा, Viral Video
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Maharashtra Kesari Wrestling Tournament Winner Prithviraj Mohol Reaction on shivraj rakshe
होय शिवराज राक्षेची एका बाजूची पाठ नक्कीच टेकली होती : पृथ्वीराज मोहोळ
RTE admission application deadline has expired how many applications have been submitted
आरटीई प्रवेश अर्जांची मुदत संपुष्टात… किती अर्ज दाखल?
Why is there a delay in the appointment of candidates who have passed MPSC
कोलमडलेले वेळापत्रक, न्यायालयीन विलंब, लालफीतशाही… ‘एमपीएससी’ उत्तीर्ण उमेदवारांच्या नियुक्तीस विलंब का होतो?
This years Maharashtra State Board exams include changes in grace marks awarding process
बोर्डाच्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या ‘ग्रेस’ गुणांबाबत मोठा निर्णय…
Chandrapur District Bank Recruitment Late night distribution of appointment letters to eligible candidates
रात्रीस खेळ चाले…चंद्रपूर जिल्हा बँक नोकरभरतीतील पात्र उमेदवारांना रात्री उशिरा नियुक्तीपत्रांचे वाटप
Interview schedule for PSI post finally announced by MPSC
‘एमपीएससी’ : पीएसआय पदाच्या मुलाखतीचा कार्यक्रम अखेर जाहीर; या तारखेला निकाल

उमेदवारांनी परीक्षेला दीड तास आधी उपस्थित राहणे आवश्यक आहे. या वेळेत परीक्षेचा अर्ज भरलेलाच उमेदवार परीक्षा देण्यासाठी आला आहे किंवा कसे याची बायोमेट्रिक तपासणी करण्यात येते. याबाबत परीक्षेचा अर्ज भरताना आणि परीक्षेच्या प्रवेशिकेवर लेखी कल्पना देण्यात आली आहे. त्यामुळे विहित वेळेत न आलेल्या उमेदवारांना प्रवेश दिला जात नसल्याचे स्पष्टीकरण भूमी अभिलेखकडून देण्यात आले.

Story img Loader