पुणे : कौटुंबिक वादातून झालेल्या झटापटीत तरुणाचा बाल्कनीतून पडून मृत्यू झाल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील धायरी भागात घडली. याप्रकरणी चुलतभावाला नांदेड सिटी पोलिासंनी अटक केली. अमर किसन देशमुख (वय ३५, रा. कपिल अपार्टमेंट, मतेनगर, धायरी) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा चुलतभाऊ राजू भुरेलाल देशमुख (रा. कपिल अपार्टमेंट, मतेनगर, धायरी) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत मोहपत हरीराम साहारे (वय ३६, रा. धायरी) यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू आणि त्याचा चुलतभाऊ अमर मूळचे मध्य प्रदेशातील आहे. दोघे जण एका खाद्यपदार्थ निर्मिती करणाऱ्या कंपनीत कामाला आहेत. शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास राजू आणि अमर यांच्यात कौटुंबिक कारणावरुन वाद झाले. पत्नीबद्दल अपशब्द उच्चारल्याने त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर अमर हा चुलतभाऊ राजूच्या अंगावर धावून गेला. झटपटीत राजूने अमरला धक्का दिला. सदनिकेच्या बाल्कनीतून अमर पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा