पुणे : विदर्भात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका सुमारे ३०,७९६ हेक्टरवरील पिकांना बसला आहे. चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यांत सर्वाधिक नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे सुरू आहेत. पचनामे सुरू असल्यामुळे नुकसानीच्या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज आहे.

कृषी आयुक्त कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, दहा आणि ११ फेब्रुवारी रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे प्राथमिक अहवालानुसार विदर्भात एकूण ३०,७९६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान चंद्रपूर जिल्ह्यात झाले असून, चंद्रपूर, वरोरा, भद्रावती आणि पोंभुर्णी तालुक्यांत १२,९३८ हेक्टरवरील गहू आणि हरभरा पिकाचे नुकसान झाले आहे. नागपूर जिल्ह्यातील नागपूर, कामठी, हिंगणा, सावनेर, काटोल, कळमेश्वर, रामटेक, मौदा, उमरेड, कुही आणि भिवापूर तालुक्यांत ८,८०८ हेक्टरवरील गहू, हरभरा कापूस, भाजीपाला, संत्रा, मोसंबी आणि रब्बी सोयाबीनचे नुकसान झाले आहे. वर्धा जिल्ह्यात देवळी, हिंगणघाट, आर्वी, आष्टी आणि कारंजा तालुक्यांतील ४,४२३ हेक्टरवरील हरभरा, गहू, तूर आणि भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे.

What is the water storage in the Khadwasla dam chain Pune news
खडवासला धरण साखळीत पाणीसाठा किती? पुण्याचा पाणीपुरवठा सुरळीत राहणार?
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
nashik jaljeevan mission aims to provide 55 liters of clean water daily
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव जिल्ह्यातच ‘जलजीवन मिशन’ संकटात, चार वर्षात केवळ २९४ योजना पूर्ण
farmers get rs 592 crore 34 lakh 90 thousand 530 in bank accounts farmers affected by natural calamities
अखेर नैसर्गिक आपत्ती बाधितांना मिळाली मदत; जाणून घ्या, कोणत्या विभागाला, जिल्ह्याला मिळाली सर्वाधिक मदत
592 crores assistance to those affected by natural disasters
नैसर्गिक आपत्ती बाधितांना ५९२ कोटींची मदत, राज्यातील ५.४० लाख शेतकऱ्यांना दिलासा
nashik water news marathi
नाशिक जिल्ह्यात ३५७ गावांत वैयक्तिक विहिरी, विंधनविहिरींवर बंदी; १५ पाणलोट क्षेत्रात भूजलाचा बेसुमार उपसा
Ambuja Cements Maratha Limestone mine in Lakhmapur Korpana taluka will cause severe pollution affecting nearby villages
चंद्रपूर : अंबुजा सिमेंटच्या लाईमस्टोन खाणीमुळे प्रदूषणात वाढ; दहा ते पंधरा गावांना…
Mumbai corporation 540 crore cleaning drains monsoon
नाल्यांच्या सफाईसाठी ५४० कोटींचा खर्च अपेक्षित

हेही वाचा – ‘जेईई मेन्स’चा निकाल जाहीर, राज्यातील किती विद्यार्थ्यांना शंभर पर्सेंटाइल?

अमरावतीतील धामणगाव रेल्वे तालुक्यात २,५७५ हेक्टरवरील गहू, हरभरा, भाजीपाला आणि फळपिकांचे नुकसान झाले आहे. भंडारा जिल्ह्यातील भंडारा, पवनी, साकोली आणि लाखनी तालुक्यांत १,९६१ हेक्टरवरील गहू, हरभरा, जवस आणि भाजीपाला पिकांना फटका बसला आहे. गोंदियातील मोर अजुर्नी तालुक्यात ९० हेक्टरवर भाताचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा – भिगवणजवळ भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

नुकसानीचे क्षेत्र वाढणार

नागपूर जिल्ह्यात सुमारे अकरा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. पुढील चार दिवसांत पंचनामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे. प्रामुख्याने भात, गहू या रब्बी पिकांना अवकाळीचा फटका बसला आहे, अशी माहिती नागपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांनी दिली.

Story img Loader