लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : अयोध्या येथील राममंदिर उद्घाटनाच्या आनंद सोहळ्यात गीतरामायणाचा समावेश आवश्यक करावा, अशी मराठी जनांची मागणी असल्याची भावना माडगूळकर कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. राममंदिरामध्ये एक कोपरा गदिमा-बाबुजी यांच्या गीतरामायणासाठी राखीव करावा, अशी अपेक्षा गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी बोलून दाखविली.

Shraddha Kapoor Screen 11 unveiling of The Indian Express Group mumbai news
श्रद्धा कपूरच्या हस्ते ‘स्क्रीन’चे आज अनावरण; मनोरंजन विश्वाचा वेध घेणारे नियतकालिक ११ वर्षांनी वाचकांच्या भेटीला
IND vs PAK Abhishek Sharma and Pakistani Bowler Fights Indian Batter Gives Death Stare After Fiery Send Off Watch Video
IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यात राडा, पाकिस्तानी गोलंदाजाने…
Rohit Sharma Suryakumar Yadav Post on Ratan Tata Death Cricketing World Mourn on Tata Demise
Ratan Tata Death: “इतरांचं आयुष्य चांगलं व्हावं यासाठी जगलात…”, रोहित शर्माची रतन टाटांसाठी भावुक करणारी पोस्ट; सूर्यकुमार यादवनेही व्यक्त केली कृतज्ञता
Ratan Tata Died at 86 in Marathi
Ratan Tata Death : “…कारण महापुरुष कधीच मरत नाहीत”, रतन टाटांच्या निधनानंतर आनंद महिंद्रांची पोस्ट
Rashmi Thackeray, Maha Aarti, Tembhinaka,
रश्मी ठाकरे टेंभी नाक्यावरील देवीच्या दर्शनाला
Varanasi Temple Sai Baba Row
Sai Baba Temple Row : काशीतल्या १० मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवल्या, सनातन रक्षक दलाच्या कृतीमुळे नवा वाद
Vidhan Sabha Election 2024
अजित पवारांच्या पक्षाला अपेक्षित यश मिळविण्यात अडचणी- ज्योतिषांची भविष्यवाणी
ramdas kadam on sanjay shirsat
“उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचं खच्चीकरण केलं”, रामदास कदम यांचा गंभीर आरोप; म्हणाले, “त्यांच्या मृत्यूच्या काही दिवसांपूर्वीच… ”

केंद्रीय वाहतूकमंत्री नितिन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी मनातले गीतरामायणाचे महत्त्व पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्यापर्यंत पोहोचवायला हवे. अयोध्येतील राममंदिरात एक कोपरा तरी गीतरामायण आणि गदिमा-बाबुजी यांच्यासाठी राखीव हवा असे मनापासून वाटते, असे सुमित्र माडगूळकर यांनी सांगितले.

आणखी वाचा-परीक्षेचं टेन्शन आलंय? ‘सीबीएसई’ करणार विद्यार्थ्यांना मदत…

महाराष्ट्राबाहेरही गीतरामायण पोहोचले पाहिजे. २२ जानेवारी रोजी होणाऱ्या आनंद सोहळ्यात गीतरामायणाचा समावेश झाला तर यासारखा परमोच्च आनंद दुसरा नाही. मुख्यतः राम मंदिरात एक छोटे गीतरामायण मंदिर हवे. गीतरामायणाचे अनेक भाषांत रूपांतर झाले आहे. त्यामुळे गीतरामायण आता महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता भारतमय व्हावे ही श्रीराम चरणी प्रार्थना, असल्याची भावना सुमित्र माडगूळकर यांनी व्यक्त केली.