पुणे : देशात घरांच्या किंमतीत यंदा वाढ नोंदवण्यात आली आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत प्रमुख आठ महानगरांमध्ये घरांच्या किमतीत सरासरी ७ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. सर्वाधिक १० टक्के वाढ बंगळुरू शहरात झाली असून, त्याखालोखाल पुण्यात ८ टक्के वाढ झाली आहे.
देशातील प्रमुख महानगरांमधील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल ‘प्रॉपटायगरडॉटकॉम’ने जाहीर केला आहे. यानुसार, जानेवारी ते मार्च २०२३ या कालावधीत नवीन घरांच्या सरासरी किमतीत वाढ झाली आहे. मागील वर्षातील पहिल्या तिमाहीच्या तुलनेत बंगळुरूमध्ये ही वाढ १० टक्के आहे. देशातील प्रमुख महानगरांमध्ये बंगळुरूत घरांच्या किमती सर्वांत जास्त वाढल्या आहेत. त्याखालोखाल पुण्यात ही वाढ ८ टक्के आणि अहमदाबादमध्ये ७ टक्के आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>पुणे : स्टेशन परिसरातील तारांकित हॉटेलमध्ये चालायचा वेश्या व्यवसाय; दलालासह चार तरुणी ताब्यात

घरांच्या किमतीत वाढ होण्याचे प्रमुख कारण महागाई हे आहे. मागील काही काळापासून देशात घरांच्या किमती वाढत आहेत. यात कच्चा माल आणि कामगारांचा वाढलेला खर्च प्रामुख्याने कारणीभूत ठरत आहे. याचबरोबर करोना संकट ओसरल्यानंतर घरांची मागणी वाढली आहे. तसेच, सरकारने मार्चपासून घरांवर दिले जाणारे अंशदानही बंद केले आहे. यामुळे घरांच्या किमती महागल्या आहेत, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
सध्या रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढीबाबत जैसे थे धोरण स्वीकारले आहे. महागाईचा दर वाढल्यास रिझर्व्ह बँकेकडून पुन्हा व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे पर्यायाने गृहकर्जे महाग होऊन ग्राहकांवरील बोजाही वाढणार आहे, असेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

शहर घरांचा प्रतिचौरस फूट दर किमतीत वाढ (टक्क्यांमध्ये)
मुंबई १०२००-१०४०० ५
पुणे ५८००-६००० ८
बंगळुरू ६२००-६४०० १०
अहमदाबाद ३७००-३९०० ७
दिल्ली ४७००-४९०० ६
हैदराबाद ६२००-६४०० ४
कोलकाता ४६००-४८०० ६
चेन्नई ५७००-५९०० १

भारतातील प्रमुख शहरांमध्ये घरांच्या किमती मागील वर्षभरापासून ६ ते ७ टक्क्याने वाढत आहेत. कच्च्या मालाचा खर्च महागल्यामुळे आणि तयार घरांना ग्राहकांचे असलेले प्राधान्य यामुळे घरांच्या किमती वाढत आहेत.- अंकिता सूद, संशोधन प्रमुख, प्रॉपटायगरडॉटकॉम

हेही वाचा >>>पुणे : स्टेशन परिसरातील तारांकित हॉटेलमध्ये चालायचा वेश्या व्यवसाय; दलालासह चार तरुणी ताब्यात

घरांच्या किमतीत वाढ होण्याचे प्रमुख कारण महागाई हे आहे. मागील काही काळापासून देशात घरांच्या किमती वाढत आहेत. यात कच्चा माल आणि कामगारांचा वाढलेला खर्च प्रामुख्याने कारणीभूत ठरत आहे. याचबरोबर करोना संकट ओसरल्यानंतर घरांची मागणी वाढली आहे. तसेच, सरकारने मार्चपासून घरांवर दिले जाणारे अंशदानही बंद केले आहे. यामुळे घरांच्या किमती महागल्या आहेत, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
सध्या रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढीबाबत जैसे थे धोरण स्वीकारले आहे. महागाईचा दर वाढल्यास रिझर्व्ह बँकेकडून पुन्हा व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे पर्यायाने गृहकर्जे महाग होऊन ग्राहकांवरील बोजाही वाढणार आहे, असेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

शहर घरांचा प्रतिचौरस फूट दर किमतीत वाढ (टक्क्यांमध्ये)
मुंबई १०२००-१०४०० ५
पुणे ५८००-६००० ८
बंगळुरू ६२००-६४०० १०
अहमदाबाद ३७००-३९०० ७
दिल्ली ४७००-४९०० ६
हैदराबाद ६२००-६४०० ४
कोलकाता ४६००-४८०० ६
चेन्नई ५७००-५९०० १

भारतातील प्रमुख शहरांमध्ये घरांच्या किमती मागील वर्षभरापासून ६ ते ७ टक्क्याने वाढत आहेत. कच्च्या मालाचा खर्च महागल्यामुळे आणि तयार घरांना ग्राहकांचे असलेले प्राधान्य यामुळे घरांच्या किमती वाढत आहेत.- अंकिता सूद, संशोधन प्रमुख, प्रॉपटायगरडॉटकॉम