पुणे : राज्यात निरभ्र आकाशाची स्थिती आणि कोरडय़ा हवामानामुळे रात्रीच्या किमान तापमानात घट होऊन गारव्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे. तापमानातील ही घट तीन ते चार दिवस कायम राहणार आहे. त्यानंतर मात्र पुन्हा तापमानात काही प्रमाणात वाढ होऊन गारवा कमी होण्याची शक्यता आहे. सद्य:स्थितीत पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी रात्रीच्या गारव्यात वाढ झाली आहे. या भागात उन्हाचा चटकाही कमी आहे.

बंगालचा उपसागर आणि त्यानंतर अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने दक्षिणेकडील राज्यांमध्ये पाऊस झाल्याने महाराष्ट्रात अंशत: ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यातून रात्रीच्या किमान तापमानात वाढ होऊन प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र आणि कोकणात थंडी कमी झाली. सध्या पावसाळी स्थिती निवळली आहे. त्यामुळे राज्यातही निरभ्र आकाश आणि कोरडय़ा हवामानाची स्थिती निर्माण झाली. त्यातून गेल्या दोन दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भातील रात्रीच्या तापमानात घट झाली आहे. त्यापाठोपाठ आता मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही तापमानात घट होत आहे.  बंगालच्या उपसागरामध्ये दोन दिवसांत पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचे संकेत आहेत. त्याचा सध्या तरी राज्यावर कोणता परिणाम होणार नसल्याचे दिसते आहे. हिमालयीन विभागात काही भागांत बर्फवृष्टीची शक्यता आहे. उत्तकरेकडील राज्यांमधील तापमानात घट होणार आहे. गुजरातमध्येही किमान तापमान २-३ अंशांनी कमी होणार आहे. याच काळात महाराष्ट्रातही तापमानातील घट कायम राहणार आहे. २२ नोव्हेंबरपासून मात्र तापमानात किंचित वाढ होईल.

nisargalipi A sign of arrival of spring season
निसर्गलिपी : वसंतागमनाची चाहूल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
India Climate Change Inflation Agriculture Farmers
व्यवसायाभिमुख पिके हवीत!
weather forecast maharashtra Summer heat cold February maharashtra weather department
फेब्रुवारीपासूनच उन्हाच्या झळा, राज्यातील थंडी संपली? हवामान विभागाचा अंदाज काय?
pune highest temperature marathi news
Pune Temperature : जानेवारीतील सर्वाधिक तापमानाचा नवा विक्रम; उष्णता का वाढली?
Maharashtra hailstorm loksatta news
उत्तर महाराष्ट्रात गारपीट, हलक्या पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान विषयक स्थिती आणि इशारा
mumbai temprature today
Mumbai Temprature: मुंबईत तापमान सामान्य पातळीच्याही खाली, पण गारवा अल्पकाळासाठीच; वाचा काय आहे हवामान विभागाचा अंदाज!
weather department expressed possibility of increasing heat in Mumbai for next one or two days
मुंबईत उकाडा वाढण्याची शक्यता

रात्रीचे तापमान सरासरीखाली

मुंबई शहर वगळता राज्याच्या जवळपास सर्वच विभागांमध्ये रात्रीचे किमान तापमान सरासरीखाली आहे. त्यामुळे रात्री गारवा आहे. मुंबईतील तापमान सरासरीच्या बरोबरीत आहे. गुरुवारी (१७ नोव्हेंबर) नगर येथे राज्यातील नीचांकी १२.० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ औरंगाबाद १२.५, महाबळेश्वर १२.८, पुणे १२.९ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले. सोलापूर, सातारा, परभणी, अमरावती, गोंदिया, वर्धा आदी भागांतही सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात मोठी घट झाल्याने गारवा जाणवतो आहे.

Story img Loader