इंदापूर: माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाची बारावी बोर्डाची परीक्षा आज पासून सुरू झाली. या परीक्षार्थ्यांचे इंदापूर महाविद्यालयामध्ये गुलाब फुले देऊन उस्फुर्त स्वागत करण्यात आले.  राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री तसेच संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील , संस्थेच्या उपाध्यक्षा पद्माताई भोसले , संस्थेचे सचिव ॲड.मनोहर चौधरी तसेच संस्थेचे सर्व संचालक यांनी परीक्षार्थींना शुभेच्छा संदेश दिला आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जीवन सरवदे ,उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे व सर्व मान्यवर प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे उत्साहात स्वागत केले. व त्यांना या परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी डॉ. जीवन सरवदे म्हणाले की,’ सर्व विद्यार्थ्यांचे परिक्षेचा ताण कमी करण्यासाठी स्वागत करणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी कोणताही ताण न घेता सकारात्मक वृत्तीने परीक्षेस सामोरे जावे व यशस्वी व्हावे.प्रा. दत्तात्रय गोळे म्हणाले की,’ माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा संदेश दिला आहे.विद्यार्थ्यांना या परीक्षाकरिता मनःपूर्वक शुभेच्छा.

यावेळी कला विभाग प्रमुख डॉ. भिमाजी भोर , विज्ञान विभाग प्रमुख डॉ.शिवाजी वीर, क्रीडा संचालक डॉ. भरत भुजबळ, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.सदाशिव उंबरदंड , प्रा.आत्माराम फलफले, डॉ.राजाराम गावडे , प्रा. श्रीनिवास शिंदे , डॉ. शितल पवार , प्राध्यापिका सुवर्णा जाधव,प्रा. श्याम सातार्ले , प्रा.रवींद्र साबळे यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा. बापू घोगरे यांनी केले.आभार प्राध्यापिका कल्पना भोसले यांनी मानले.

Story img Loader