इंदापूर : इंदापूर तालुक्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये शेतकऱ्यांचा कल आंतरपीकाकडे वाढू लागला असून बहुतांश ठिकाणी शेतकरी आवर्जून आंतरपीके घेत असल्याचे चित्र तालुक्याच्या विविध भागांमध्ये आढळून येत आहे. पारंपारिक पिकाला फाटा देऊन शेतकरी नगदी नफा मिळवून देणारी अनेक पिके घेऊ लागला आहे. मात्र, बाजारपेठेमध्ये शेतमालाची होणारी आवक आणि प्रत्यक्षात मिळणारे ग्राहक यावरच बहुतांशी शेतमालाचा दर ठरत असल्याने, या बेभरवशाच्या बाजारभावावर तोडगा म्हणून शेतकरी एकाच पिकात अनेक आंतरपीक घेऊ लागले आहेत.

शेतमालाचा बेभरवशाचा बाजारभाव, पीक उत्पादनासाठी सातत्याने वाढत असलेला खर्च, महागलेली रासायनिक खते,बि- बीयाणे खते कीटकनाशके तणनाशकाच्या वाढलेल्या किंमती, आणि ग्रामीण भागात शेतमजुरांचा पडलेला प्रचंड तुटवडा आदी कारणांमुळे शेतकरी आता आंतर पिकाकडे वळलेला दिसून येत आहे. इंदापूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या पिकात दुहेरी तिहेरी आंतरपीके घेऊन खर्च आणि उत्पादनाचा ताळमेळ घालण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड दिसून येत आहे.

Contractual workers of Navi Mumbai civic body to launch strike for equal pay
नवी मुंबईत कंत्राटी सफाई कामगारांचे आंदोलन सुरु ! पालिकेने नाका कामगारांकडून  कचरा संकलन सुरु केल्याचा दावा…
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
rising demand for wildlife derived products undermines global conservation efforts and wildlife protection goals
… म्हणून होते वाघांची शिकार
substandard pesticides used in field led to penal action against concerned company
अप्रमाणित कीटकनाशक करताहेत शेतकऱ्यांचा घात!
maize ethanol loksatta news
राज्यात मक्याचे क्षेत्र दुप्पटीने वाढले; जाणून घ्या, क्षेत्र वाढ का आणि किती झाली
Wheat crop production is likely to increase in Indapur taluka |
इंदापूर तालुक्यात गव्हाचे पीक जोमदार; रब्बी हंगामातील सर्वच पिकांची परिस्थिती समाधानकारक, गव्हाचे उत्पादन वाढण्याची शक्यता
raigad collector recommended increasing compensation for farmers affected by virar alibag aorridor
शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्याची शासनाला शिफारस, रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र पाठविल्याने शेतकऱ्यांचा मोर्चा रद्द
Patil family grew strawberries farm in Nagpur
पाटील कुटुंबाने पिकविली रसदार स्ट्रॉबेरी, नागपूरकरांच्या पडतात उड्यावर उड्या

कोणत्या पिकाला कोणत्या वेळी कधी चांगला बाजार येईल आणि कोणत्या पिकाचा कोणत्या वेळी कधी बाजार भाव ढासळेल हे सांगता येत नसल्याने एकाच पिकात अनेक पिके घेऊन कसा तरी पिकाला होणारा खर्च काढण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. एका नाही, दुसऱ्या पिकात तरी परवडेल म्हणून फळबागेमध्ये कांदा त्यामध्येच मिरची ,कोथिंबीर ,हरभरा अशी आंतरपिके घेऊन ,कमी खर्चामध्ये अधिक कसे उत्पन्न निघेल, आणि कोणत्या ना, कोणत्या पिकाला बाजार भाव मिळेल. या आशेने आम्ही अलीकडच्या काळामध्ये आंतरपीकाकडे वळालो असे पळसदेव येतील उद्यमशील शेतकरी श्री.बाळासाहेब महादेव काळे यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.

Story img Loader