आळंदी : आळंदीत पुन्हा एकदा इंद्रायणी नदी फेसाळली आहे. काही तासांपूर्वीच माऊलींच्या पालखी प्रस्थानावेळी इंद्रायणी प्रदूषणमुक्त करण्याचं वचन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांना दिलं होतं. इंद्रायणी स्वच्छ करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं म्हटलं होतं. हे आश्वासन देऊन काही तास उलटले नाही, की पुन्हा एकदा इंद्रायणी नदी फेसाळलेली आहे.

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा आळंदीतील गांधीवाडा आजोळघरी पहिला मुक्काम झाला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याला उपस्थिती लावून माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले. वारकऱ्यांशी संवाद साधला. फुगडी खेळण्याचा आनंद ही घेतला. इंद्रायणी नदीची पाहणी केली. इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी कटिबद्ध असून इंद्रायणी स्वच्छ करण्याच वचन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं.

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
sharad pawar marathi news (1)
अजित पवारांच्या ‘मी नवखा नाही’ विधानावर शरद पवारांचं खोचक भाष्य; म्हणाले, “खिशात ७० रुपये असताना…”!
Sharad Pawar rohit sharma virat Kohli retirement
निवृत्ती कधी घ्यावी? विराट कोहली-रोहित शर्माबद्दल बोलताना शरद पवारांनी सांगितलं ‘टायमिंग’
Nagpur Results Nitin Gadkari Major Win Can Change Prime Minister Power Game
नितीन गडकरींचा विजय पालटणार सत्तेचा खेळ? ज्योतिषतज्ज्ञ म्हणतायत, “२०२४ पर्यंत काळजी, तर २०२६ ला मोठा..”
Sharad Pawar and Ajit Pawar
अजित पवारांसाठी परतीचे दार बंद झाले का? शरद पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले, “सवाल…”

हेही वाचा…विळखा अमली पदार्थांचा… : पुणे :नशेच्या अमलाखाली शहरातील रात्रजीवन

या आधी ही काही महिन्यांपूर्वी आळंदीत शिंदे यांनी इंद्रायणी प्रदूषणमुक्त करण्याचं आश्वासन वारकऱ्यांच्या समक्ष दिलं होतं. ते आश्वासन हवेत विरल्याच बोलले जात आहे. पुन्हा एकदा दिलेल्या आश्वासनांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पूर्तता करणार का? हे देखील पाहणं महत्वाचं आहे. इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळल्याने प्रशासनाची पोलखोलच झाल्याचं बोललं जात आहे.