आळंदी : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही वेळातच आळंदीमध्ये दाखल होणार आहेत. त्याआधी इंद्रायणी नदी फेसाळल्याचे चित्र आहे. महायुती सरकारने इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्याच आश्वासन दिलं होतं. तसं माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला होता. परंतु, त्यानंतरही इंद्रायणी नदी प्रदूषित होत असल्याचं वारंवार चित्र समोर आलेलं आहे.

इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली आहे. गेल्या आठवड्यामध्येच इंद्रायणी नदी फेसाळल्याचे चित्र पाहायला मिळालं होतं. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आळंदी दौऱ्यावर आहेत. त्याआधीच इंद्रायणी नदी फेसाळल्याने इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महायुतीचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आळंदीमध्येच एका कार्यक्रमादरम्यान इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्याचा शब्द दिला होता, तसं जाहीररित्या आश्वासन दिलं होतं. परंतु, हे आश्वासन हवेत विरलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनानंतरही काही हालचालींना वेग आलेला नाही.

Devendra Fadnavis At Loksatta Varshavedh
Loksatta Varshavedh : ‘वर्षवेध’ मध्ये २०२४ चा परिपूर्ण माहितीकोश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
new Income Tax Bill
सहा दशके जुना प्राप्तिकर कायदा बदलणार? नवीन विधेयकात काय आहे? सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार?
finance minister Nirmala Sitharaman
प्रतिशब्द : भरवसूली चोहिकडे!
Request to Urban Development Minister eknath shinde for Uruli-Phursungi TP scheme
उरुळी-फुरसुंगी ‘टीपी’साठी नगरविकास मंत्र्यांना साकडे!
Budget New Income Tax Act for tax reforms
कर सुधारणांसाठी नवीन प्राप्तिकर कायदा
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : सुरेश धस सगळा हिशेब मांडत म्हणाले, “धनंजय मुंडे पालकमंत्री असताना ७३ कोटी…”
Vasai Virar Municipal Solid Waste Management Project marathi news
‘पैसे नाहीत, असे कसे म्हणता?’, महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

आणखी वाचा-…तर मुळशीतून पाणी द्या; आयुक्तांची भूमिका

इंद्रायणी नदीच्या आजूबाजूच्या कंपन्यांमधून आजही रासायनिक आणि प्रक्रिया न केलेलं पाणी थेट इंद्रायणी नदीमध्ये सोडलं जात आहे. यावर कारवाई करून संबंधित कंपनींना दंड आकारणे गरजेचा आहे. त्यांच्यावर कडक कारवाई होणं अत्यावश्यक आहे. असं वारंवार आळंदीतील नागरिकांनी मागणी केलेली आहे. तरीही महायुतीच्या सरकारनं याकडे लक्ष दिलं नाही यामुळे वारकऱ्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी आहे. यावर आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही बोलणार का? याकडे वारकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

Story img Loader