पुणे : अटल सेतूला पडलेल्या भेगा मी पाहिल्या. केवळ या सेतूच्या कामाचीच नाही, तर राज्य सरकारने केलेल्या सर्वच मोठ्या खर्चाच्या प्रकल्पांची चौकशी व्हावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात केली. खासदार म्हणून विजयी झाल्यानंतर सुळे यांनी प्रथमच पक्ष कार्यालयाला शनिवारी भेट दिली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शहराध्यक्ष प्रशांत जगताप या वेळी उपस्थित होते.

पत्रकारांशी बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, की अटल सेतूचे काम निकृष्ट असल्याचे समोर आले आहे. या सरकारने घाईने कोट्यवधींचे प्रकल्प केले. त्याचा हा परिणाम आहे. या सरकारने केलेल्या अशा सर्वच मोठ्या कामांची चौकशी लावायला हवी. राज्यात पेपरफुटी झाली, शेतकऱ्यांना फसविण्यात आले, बेरोजगारांना काम मिळत नाही, महिलांवर अत्याचार होत आहेत. अशी कोणती गोष्ट आहे, की त्यावर हे सरकार चांगले काम करत आहे? मुलींना विनामूल्य शिक्षण या विषयावर पालकांनी रस्त्यावर येऊन आंदोलन करावे, मी स्वतः त्यात सहभागी होईन. मुलींना विनामूल्य शिक्षण ही घोषणा राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी केली. त्याचे पुढे काहीच झाले नाही. सर्व पालकांना पैसे जमा करावेच लागले.

question of alternative to POP idol remains unsolved
पीओपी मूर्तींच्या पर्यायाचा प्रश्न अनुत्तरितच
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
badlapur rape case marathi news
बदलापूर प्रकरणात माध्यम प्रतिनिधींचा आरोपींमध्ये समावेश; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, नोटीसा आल्याने संताप
dead lizard found in spice packet
Dead Lizard Found In Spices : धक्कादायक! पोषण आहाराच्या मसाल्यात चक्क पाल; चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ…
uddhav thackeray latest marathi news,
“सरकार उलथून टाकण्यासाठी एकत्र या”, उद्धव ठाकरे यांचे सरपंचांना आवाहन
Ajit Pawar in trouble again due to controversial statement
वादग्रस्त विधानाने अजित पवार पुन्हा अडचणीत
Violent protests in Assam over the gang rape of a minor girl
आसाममध्ये जोरदार निदर्शने; अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
UPSC lateral entry
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या थेट भरतीच्या निर्णयावरून एनडीएत मतभेत? कुणाचा पाठिंबा, तर कुणाचा विरोध; नेमकं काय घडलं?

हेही वाचा : काँग्रेस भवनात झाडाझडती, हाणामारी; प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

राज्यातील जातीय संघर्षाला हेच सरकार जबाबदार आहे. केंद्राने जनगणनाच केली नाही. ती झाली नाही म्हणून समोर कसलीही आकडेवारी नाही. मग कशाच्या आधारावर आरक्षण जाहीर केले जाते. घटनेत दुरुस्ती हा केंद्राच्या अखत्यारितील विषय आहे. यापूर्वी सरकार त्यांचेच होते, आता संख्या कमी झाली, तरीही त्यांचेच सरकार आहे. पण ते दुरुस्ती करत नाहीत. कारण त्यांना भांडणेच लावायची आहेत, असेही सुळे यांनी या वेळी सांगितले.