पिंपरी : काहीजण संकटात गेल्यामुळे अडचणीत गेले.अडचणीत गेल्यामुळे वळचणीला जाऊन बसावे लागले. ही परिस्थिती आहे. परिस्थिती कायम राहत नसते. परिस्थिती बदलत असते असे सांगत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटावर जोरदार हल्ला केला.

पिंपरीतील एका कार्यक्रमात बोलताना पाटील म्हणाले, आमच्या पक्षातील काही लोक तिकडे गेले आहेत. काहीजण संकटात गेल्यामुळे अडचणीत गेले.अडचणीत गेल्यामुळे वळचणीला जाऊन बसावे लागले ही परिस्थिती आहे. परिस्थिती कायम राहत नसते. परिस्थिती बदलत असते. यापुढे बुद्धिमान मतदार सुजाणपणाने वाटचाल करेल. कोणाच्या मागे जाऊन थांबायचे याचा योग्य निर्णय घेण्याचे काम या देशातील जनता करत असते. आता निवडणूक विकासावर नाही तर विचारावर होणार आहे. तुम्ही कोणत्या विचारांच्या मागे आहेत हे पाहून लोक मतदान करतील.

behavior, offensive, past, someone behavior,
माणसं अशी का वागतात?
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
due to police promptness Bibwewadi Girls Missing for 24 Hours Found in Kalyan
बिबवेवाडीतून तीन शाळकरी मुली बेपत्ता; पोलिसांच्या तत्परतेमुळे शोध मुली कल्याणमध्ये सुखरुप सापडल्या
Two young man died by drowning during wash bulls
बैल धुण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा मृत्यू! पोळा सणावर शोकाचे सावट
Agricultural Commodity Markets Rice Exports Ethanol Producers
तांदूळ, साखर, मका; पुढे इथेनॉलचा धोका
jaipur kid not leaving kidnapper viral video
Video: चिमुकल्याला लागला अपहरणकर्त्याचा लळा, आई-वडिलांकडेही जाईना; पोलिसांनी सोडवताच रडू लागला!
police arrest five for killing 28 year old man in pimpri chinchwad
बायकोच्या अंगावर फेकलेल्या चिठ्ठीचा जाब विचारणाऱ्या पतीचा खून
Man murders wife for not giving birth to child Nagpur crime news
मूल होत नसल्याने पत्नीचा खून केला आणि मृतदेहाजवळ तब्बल सहा तास…

हेही वाचा >>>निवडणूक आयोगामोर सुनावणी सुरू असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मोठे विधान म्हणाले, “अदृश्य शक्ती…”

आता पक्षाची चोरी होत आहे. शिवसेनेची चोरी झाली. आता आमच्या पक्षाची चोरी होऊ नये. पक्ष, चिन्ह काढून घेण्याचे मनसुबे आहेत. आता खुर्चीत बसलेला निर्णय देत नाही. दुसराच कोण तरी निर्णय लिहून देतो आणि तो खुर्चीतील व्यक्ती वाचून दाखवतो. त्यामुळे आता चिन्ह, पक्ष न बघता लोक विचार बघून मते करतील, असेही पाटील म्हणाले.निवडणूक आयोगामोर सुनावणी सुरू असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मोठे विधान म्हणाले, “अदृश्य शक्ती…”