पुण्यातील सदाशिव पेठेत एका तरुणाने तरुणीवर कोयत्याने भररस्त्यात हल्ला केला. मंगळवारी (२७ जून) दिवसा ढवळ्या हा हल्ला होत असताना अनेकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. मात्र, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या लेशपाल जवळगे, हर्षद पाटील आणि दिनेश मडावी या तीन तरुणांनी जीवाची बाजी लावत या तरुणीला कोयता हल्ल्यापासून वाचवलं. ही घटना समोर येताच, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या मुलांसाठी ५१ हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते. त्यापार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी या तिघांचीही काल (२९ जून) भेट घेतली. भेट घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी एक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी एक मुद्दा अधोरेखित केला आहे.

“पुण्यात माथेफिरूने केलेल्या हल्ल्यात,एका तरुणीचा जीव वाचणाऱ्या तीन जिगरबाज योद्ध्यांना आज भेटलो. लेशपाल जवळगे, हर्षद पाटील, दिनेश मडावी या तीन तरुणांनी आपल्या जीवाची बाजी लावत एका तरुणीचा जीव वाचवला. इतकंच नव्हे तर हल्ला करणाऱ्या तरुणाचा जीव देखील या युवकांनी वाचवला आहे”, असं ट्वीट जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे.

Seventeen year old Himanshu Chimane killed after dispute over social media post two arrested
इंस्टाग्रामवरील पोस्ट ! एकाचा खून आणि दोन बंधू पोलीस कोठडीत,
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
dhananjay Munde and karuna munde son
धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्या मुलाच्या सोशल मीडिया पोस्टमुळे खळबळ; म्हणाला, “माझे बाबा…”
pune crime news in marathi
पुणे : प्रेमप्रकरणातून मुलाच्या वडिलांचे अपहरण, हडपसर पोलिसांकडून अपहृत वडिलांची १२ तासांत सुटका
What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
Ramesh Deo
मुंबईतील ‘या’ रस्त्याला दिले दिवंगत अभिनेते रमेश देव यांचे नाव; अजिंक्य देव भावना व्यक्त करत म्हणाले, “त्यांनाही निश्चितच आनंद…”
gadchiroli tribal couple
मुख्यमंत्री साहेब माझ्या मुलाला वाचवा; आदिवासी दाम्पत्याची व्यथा, तीन दिवसांपासून उपाशी, पत्नीचे मंगळसूत्र मोडले
mother and her boyfriend sentenced to life for murdering her child by drowning
मुलाचा खूनप्रकरणी, आईसह प्रियकरास जन्मठेप

हेही वाचा >> लेशपाल…! कुठे कुठे आणि कसा पोहोचणार? बघ्यांच्या समाजात बाई तू…

ते पुढे म्हणाले की, “या तिघांसोबत गप्पा मारत असताना एक गोष्ट मात्र जाणवली आणि सुखद धक्का बसला. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या मार्गावर चालणारी ही मुलं आहेत. सदर घटना घडल्यानंतर ते अचानक प्रसिद्धीच्या झोतात आले. अनेकांनी त्यांची काळजी पोटी चौकशी केली. परंतु अनेकांनी त्या हल्लेखोरांची जात विचारून त्यांना हैराण केले. मुलीची जात विचारून तिची ओळख नेमकी काय आहे, हे विचारण्यापर्यंत काही लोकांची मजल गेली. या प्रकाराने ही मुलं दुःखी दिसली.”

हेही वाचा >> “त्या मुलीची जात कुठली?…”, पुण्यातील कोयता हल्ल्याप्रकरणी लेशपालची इन्स्टा स्टोरी चर्चेत

“याबद्दल बोलताना त्यांचा सामूहिक सूर असा दिसला की, ‘आम्ही जात बघून त्या मुलीला वाचवलं नाही. आमच्यासमोर एका मुलीचा जीव जातोय आणि अशा वेळी आम्ही षंढासारखे गप्प बसू शकत नव्हतो. आपल्या बहिणीची रक्षा केली पाहिजे, या विचाराने आम्ही तिचा जीव वाचवला…!’ विचारांनी प्रगल्भ आणि शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार समर्थपणे पुढे घेऊन जाणारे हे वाघ आहेत. अशी तरुण मंडळी या समाजात मोठ्या संख्येने निर्माण झाली तर आपल्या राज्याचं भविष्य नक्कीच उज्वल असेल, यात शंका नाही. मी शब्द दिला होता त्याप्रमाणे, तिघांना पारितोषिक दिलं आहे. या तिन्ही मुलांनी एक प्रेमळ आणि हक्काची मागणी केली की, त्यांना पवार साहेबांना भेटायचं आहे..! आणि लवकरच मी त्यांची ही मागणी देखील पूर्ण करणार आहे”, असंही जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे.

दरम्यान, लेशपालने पीडितेचा जीव वाचवल्यानंतर त्याला इन्स्टाग्रामवर खूप लोकांनी मेसेज केले. त्या मुलीची आणि मुलाची जात कोणती असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. त्यावेळी त्याने उद्विग्न होऊन इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली. “त्या मुलीची आणि मुलाची जात कुठली होती असं मला DM करून विचारणाऱ्या सडक्या बुद्धीजीवांनो विनंती आहे की ते मेसेज डिलिट करा. ना तुम्ही तुमच्या जातीचे होऊ शकता. ना ही समाजाचे. कीड लागली आहे तुमच्या वरचा थोड्याफार असलेल्या भागाला”, अशी इन्स्टाग्राम स्टोरी लेशपालने ठेवली होती.

Story img Loader