पुणे : कसबा विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने आणि नवनिर्वाचित काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांच्यात शाब्दिक युद्ध रंगण्यास सुरूवात झाली आहे.

भाजप नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर रवींद्र धंगेकर यांनी केलेल्या आरोपाला हेमंत रासने यांनी समाजमाध्यमातून उत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलण्याइतके तुम्ही मोठे नाहीत, असे उत्तर रासने यांनी धंगेकर यांना दिले आहे.

Dhananjay Munde On Anjali Damania:
Dhananjay Munde : “धादांत खोटे आरोप, पण ज्याने कोणी आरोप करण्याचं काम दिलं असेल…”, अंजली दमानियांच्या आरोपाला धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Maharashtra Kesari 2025 result Shivraj Rakshe prithviraj mohol Controversy
Maharashtra Kesari : एवढं ‘मोहोळ’ का उठलंय? राष्ट्रवादीच्या नेत्याचा कुस्तीत राजकारण शिरल्याचा आरोप; म्हणाले, “खरा जिंकला तो…”
Rahul Gandhi
Rahul Gandhi : “७० लाख मतदार अचानक…”, राहुल गांधींचा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत गंभीर आरोप
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
Ramdas Kadam On NCP Ajit Pawar Group
Ramdas Kadam : राष्ट्रवादी-शिंदे गटात वादाची ठिणगी? रामदास कदमांचा मोठा आरोप; म्हणाले, “राष्ट्रवादीच्या ९० टक्के कार्यकर्त्यांनी…”
devendra bhuyar marathi news
अजित पवारांच्या पक्षाचा माजी आमदार म्हणतो, “अर्थसंकल्प भ्रमनिराश करणारा!”
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”

हेही वाचा >>> कसब्यात धंगेकरांच्या विजयाचा नेमका अर्थ काय? प्रकाश आंबेडकरांनी केलं महत्त्वाचं विधान; म्हणाले, “या निकालातून…”

फडणवीस भाजपला रसातळाला घेऊन जाणार आहेत. सत्ता गेल्यावर लोक त्यांना नमस्कारही करणार नाहीत. विरोधकांना राजकीय जीवनातून उद्धवस्त करण्याचा देवेंद्र फडणवीस यांचे एकमेव उद्दिष्ट आहे. लोकशाहीची हत्या कशी करायची हे फडणवीस यांच्याकडून शिकावे.  हेमंत रासने यांना त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी पाडले आहे,  असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला होता.  त्याला रासने यांनी उत्तर देताना धंगेकर यांना सल्लाही दिला आहे.

पोटनिवडणुकीत  विजयी झालात, त्याबद्दल अभिनंदन. देवेंद्रजींविषयी केलेले वक्तव्य वाचनात आले. ज्या विधानभवनात पाऊल ठेवणार आहात, त्या विधानभवनाचे पर्यायाने या महाराष्ट्राचे नेतृत्त्व देवेंद्रजींनी सलग पाच वर्षे केले आहे. त्यामुळे त्यांच्या विषयी बोलताना तारतम्य बाळगा.  देवेंद्रजींच्या कारकीर्दीवर बोलावे इतके मोठे तुम्ही नक्कीच नाहीत. कसब्याच्या जनतेने ज्यासाठी  निवडून दिले आहे, त्या जबाबदारीचे भान ठेवा.  राजकारण करायला खूप विषय आहेत, असे रासने यांनी म्हटले आहे.

Story img Loader