लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील कात्रज तलावातील गाळ काढण्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. महापालिकेच्या सांडपाणी आणि मलनि:स्सारण विभागाकडून दहा हजार घनमीटर एवढा गाळ तलावातून काढण्यात आल्याने तलावाची साठवणूक क्षमता एक कोटी लिटरने वाढली आहे.

bmc impose waste management charges in Mumbai
मुंबईत कचऱ्यावर साडेसात हजारांपर्यंत शुल्क; खर्च वाढल्याने पालिकेकडून प्रस्ताव
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Loksatta coverage on Mumbai BMC budget 2025 in marathi
रुपये ७४,४२७,४१,००० फक्त!, मुंबई महापालिकेच्या जवळपास पाऊण लाख कोटींच्या अजस्र अर्थसंकल्पातून होणार काय?
Maharashtra Growth Momentum Fadnavis Updates at NITI Aayog
राज्याच्या विकासाचा वेग कायम राखण्यासाठी आराखडा महत्वाचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
Drain cleaning in Pimpri from February 20 Municipal Commissioner orders regional officers
पिंपरीत २० फेब्रुवारीपासून नालेसफाई; महापालिका आयुक्तांचे क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आदेश
BMC Budget 2025 Live Updates
कचरा संकलन शुल्काचा मुंबईकरांवर भार? महापालिकेचा आज अर्थसंकल्प
Request to Urban Development Minister eknath shinde for Uruli-Phursungi TP scheme
उरुळी-फुरसुंगी ‘टीपी’साठी नगरविकास मंत्र्यांना साकडे!
Classification of funds Rs 80 crore earmarked for construction of drainage lines and sewage treatment plants
आयुक्तांनी फिरविला शब्द, ८० कोटी रुपयांच्या निधीचे वर्गीकरण

कात्रज तलावालगतच्या परिसरात वेगाने नागरीकरण होत आहे. या परिसरात अनेक बांधकामे झाल्याने कात्रज तलावात थेट सांडपाणी येत असून, गाळही वाढत आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी ठोस उपाययोजना राबविण्याचे आदेश सांडपाणी आणि मलनि:स्सारण विभागाला दिले होते. त्यानुसार या विभागाकडून त्याबाबतची कार्यवाही सुरू झाली असून तलावाची पाणी साठवणूकक्षमता एक कोटी लिटरने वाढली आहे, असा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

आणखी वाचा-पुण्यात सांडपाण्याचा पुनर्वापर….४ लाख ९० हजार लिटर पाणी वापरले इमारतींच्या बांधकामासाठी

तलावात अस्तित्वातील सायफनव्यतिरिक्त दोन सायफन नव्याने कार्यान्वित करण्यात आले आहेत. कात्रज तलावाच्या परिसरातील नाल्यांचे ड्रोनच्या साहाय्याने सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणातील निरीक्षणानुसार तलावामध्ये नाल्याच्या माध्यमातून येणाऱ्या सांडपाण्यासाठी नव्याने सांडपाणी वाहिनी विकसित करून त्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी दोन दशलक्ष लिटर क्षमतेच्या सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे.

विद्युत विभागामार्फत मड पंपाच्या खरेदीची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. कात्रज तलावात पंप बसविल्यानंतर तलावामधील पाण्याची पातळी पावसाळ्यामध्ये नियंत्रित करणे शक्य होणार आहे. वाहन विभागाकडून जेसीबी आणि डंपरच्या साहाय्याने तलावातील १० हजार घनमीटर गाळ काढण्यात आला असून, त्यामुळे तलावातील पाण्याची साठवणूकक्षमता एक कोटी लिटरने वाढली आहे, अशी माहिती सांडपाणी आणि मलनि:स्सारण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

Story img Loader