पुणे : राज्यात जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे खरीप पेरणीचा टक्का वाढला आहे. जुलैअखेर राज्यभरात एक कोटी २६ लाख ३७ हजार २४४ हेक्टरवर म्हणजे सुमारे ८९ टक्के पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत.

राज्यात खरिपाचे क्षेत्र सरासरी १.४२ कोटी हेक्टर आहे. त्यापैकी एक कोटी २६ लाख ३७ हजार २४४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तृणधान्यांची पेरणी (पान ४ वर) (पान १ वरून) ६५ टक्क्यांवर गेली असून, एकूण २२ लाख ५५ हजार ३७७ हेक्टरवर तृणधान्यांची पेरणी झाली आहे. त्यात भाताची १० लाख ४८ हजार ८३८ हेक्टर, ज्वारीची ९९ हजार ६०९ हेक्टर, बाजरीची दोन लाख ७२ हजार ४८३ हेक्टर, नाचणीची ४३ हजार ७८४ हेक्टर, मक्याची सात लाख ६८ हजार ४५५ हेक्टर आणि राजगिरा, राळा कोडू, कुटकी, वरई, सावा या लहान तृणधान्यांची पेरणी २२ हजार २०८ हेक्टरवर झाली आहे.

Fraud of 200 crore rupees by the lure of money crime in Lasalgaon police station
पैसे दामदुपटीच्या आमिषाने दोनशे कोटी रुपयांना फसवणूक, लासलगाव पोलिसांत गुन्हा
ankita walawalkar reveals marriage plans and talk about future husband
अंकिताचा ‘कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे? कोकणात करणार…
percentage of women in crime is increasing what are the reasons
गुन्हेगारीत महिलांचा टक्का वाढतोय, काय आहेत कारणे?
Sudhir Mungantiwar, tigers, forest,
मुनगंटीवार म्हणतात, जंगलातील वाघांना स्थलांतरित करा..
Refund if higher salary demand guarantee from ST employees
मुंबई : जास्त वेतन आल्यास परत द्या, एसटी कर्मचाऱ्यांकडून हमीची मागणी
Maharashtra ST Employees Congress General Secretary Srirang Barge allegation regarding ST employee pay hike credit
‘एसटी’ कर्मचारी वेतनवाढ श्रेयाच्या लढाईत कर्मचाऱ्यांची फरफट; महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस म्हणते…
Executive Director of Konkan Irrigation Development Corporation approved two year plan to supply 500 million liters of daily water
भिरा’च्या पाणी प्रस्तावाला गती,शासन मंजुरीनंतर पनवेल महापालिकेचा ३४०० कोटींचा खर्च
Six thousand electricity thefts in Vasai Virar city in two and a half years
वसई: अडीच वर्षात सहा हजार वीज चोऱ्या ५० कोटींची वीज चोरी

कडधान्यांची पेरणी ६८ टक्क्यांवर गेली असून, एकूण १४ लाख ४६ हजार ३८० हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात तुरीची पेरणी १० लाख ३५ हजार ६०३ हेक्टर, मुगाची एक लाख ५२ हजार ७६ हेक्टर, उडदाची दोन लाख ९ हजार ६१ हेक्टर आणि कुळीथ, चवळी, मटकी, राजमा आणि अन्य कडधान्याची पेरणी ४९ हजार ६४० हेक्टरवर झाली आहे. कापसाची पेरणी ४० लाख ९७ हजार ६४४ हेक्टरवर झाली आहे. ती सरासरीच्या ९८ टक्के आहे.

सर्वाधिक पेरणी झालेली पिके

सोयाबिन – ४७ लाख ११ हजार ५९४ हेक्टर

कापूस – ४० लाख ९७ हजार ६४४ हेक्टर

भात – १० लाख ४८ हजार ८३८ हेक्टर

तूर – १० लाख ३५ हजार ६०३ हेक्टर

तेलबियांचा पेरा वाढला राज्यात एकूण ४८ लाख ३७ हजार ८४३ हेक्टरवर तेलबियांची लागवड झाली आहे. त्यात भुईमुगाची लागवड एक लाख १५ हजार २२३ हेक्टर, तिळाची तीन हजार ८९९ हेक्टर, कारळाची तीन हजार ९१७ हेक्टर, सूर्यफुलाची एक हजार ४७ हेक्टर, सोयाबिनची लागवड सरासरीच्या ११४ टक्क्यांवर गेली असून, ४७ लाख ११ हजार ७९४ हेक्टरवर लागवड झाली आहे. एरंडासह अन्य तेलबियांची लागवड दोन हजार १६२ हेक्टरवर झाली आहे.