पुणे : पुणे जिल्ह्यात पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ या चार लोकसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघातून सन २०१९ मध्ये अनुक्रमे भाजपचे गिरीश बापट, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रिया सुळे आणि डॉ. अमोल कोल्हे, तर शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे उमेदवार खासदार म्हणून निवडून आले. पुण्यातून ३१, तर बारामतीतून १८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. शिरूर आणि मावळमधून अनुक्रमे २३ आणि २१ उमेदवार निवडणुकीला उभे होते.

निवडणूक पार पडल्यानंतर या चारही मतदारसंघातील निवडणूक निकालाविरोधात विविध कारणे देत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या. या याचिका न्यायालयाने दाखल करून घेतल्या आहेत. या प्रकरणांची सुनावणी अद्याप सुरू आहे. परिणामी या निवडणुकीत वापरलेली मतदान यंत्रे मोहोरबंद करून भोसरी येथील गोदामात ठेवण्यात आली आहेत.

नरेश म्हस्के यांच्या खासदारकीला आव्हानाचे प्रकरण, मतदान यंत्र परत मिळविण्यासाठी निवडणूक आयोग उच्च न्यायालयात
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Extension of time to Ravindra Waikar to clarify his position on Amol Kirtikar petition print politics news
कीर्तिकरांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्यासाठी वायकर यांना मुदतवाढ
Mumbai, Badlapur Case,Suspended police Officer, Shubhada Shitole Shinde Transferred , assembly elections, police transfers, senior police inspectors
बदलापूर प्रकरणात निलंबित पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे- शिंदे यांच्यासह ठाण्यातील १४ पोलीस निरीक्षकांची मुंबईत बदली
बारामतीमधून निवडणूक लढविण्यात ‘रस’ नसलेल्या अजित पवारांना शिरूमधून निमंत्रण !
The Central Election Commission ordered the state government to transfer the officers of Revenue Police Excise Municipalities Corporations politics
तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या, निवडणूक आयोगाचे आदेश; मंगळवारपर्यंत मुदत
number of polling stations will increase One polling station for every thousand-twelve hundred voters
मतदान केंद्रांच्या संख्येत वाढ होणार; हजार-बाराशे मतदारांमागे एक मतदान केंद्र
Delhi HC directs reconstitution of IOA ad-hoc panel for wrestling
भारतीय कुस्ती महासंघावर पुन्हा हंगामी समिती; बजरंग, विनेश, साक्षी, सत्यवर्तच्या याचिकेवर न्यायालयाचा निर्णय

या याचिकांचा निकाल लागत नाही, तोवर या निवडणुकीत वापरण्यात आलेली मतदान यंत्रे तशीच ठेवावी लागतात. त्यामुळे बॅलेट युनिट, कण्ट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट अशी मिळून एकूण तब्बल २८ हजार मतदान यंत्रे गेल्या पाऊणे पाच वर्षांपासून धूळखात पडली आहेत.

हेही वाचा : रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोवर ईडीची छापेमारी, सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आम्हाला याचं…”

पुण्याचे खासदार बापट यांचे निधन झाल्याने पुणे लोकसभा मतदारसंघाची याचिका आपोआप निकाली काढण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात वापरण्यात आलेली मतदान यंत्रे बेंगळुरू येथे परत पाठवून देण्यात आली आहेत, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांनी सांगितले.