पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमातून यंदाही विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमासाठी सहावी ते बारावीचे जास्तीत जास्त विद्यार्थी, पालकांची नोंदणी करण्याची सूचना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राज्याच्या शिक्षण विभागाला दिली आहे. त्यामुळे या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त विद्यार्थी, पालकांची नोंदणी करण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर असून, विद्यार्थी, पालकांच्या नोंदणीसाठी राज्याच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना धावाधाव करावी लागत आहे.

‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात पंतप्रधान विद्यार्थ्यांशी संवाद साधून परीक्षेचे दडपण न घेण्याबाबतचे मार्गदर्शन करतात. यंदा सातवे वर्ष असलेला हा कार्यक्रम दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे होणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने बहुपर्यायी प्रश्न स्वरुपाची ऑनलाइन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सहावी ते बारावीमध्ये शिकत असलेले विद्यार्थी, पालक, शिक्षकांना १२ जानेवारीपर्यंत या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. त्याशिवाय सहभागींना संवादात्मक कार्यक्रमात प्रश्न विचारण्याची संधीही मिळू शकते, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिली आहे. तसेच कार्यक्रमाबाबत समाजमाध्यमांतून प्रसिद्धी करण्याबाबतही स्पष्ट करण्यात आले आहे.

CET exam applications marathi news
सीईटीचे अर्ज भरण्यासाठी अजून एक संधी, दुसऱ्यांदा मुदतवाढ; पाच अभ्यासक्रमांचे अर्ज १० फेब्रुवारीपर्यंत भरता येणार
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
rules for RTE admissions Change, Committee Education Department
आरटीईच्या प्रवेशांसाठीच्या नियमांमध्ये होणार बदल… शिक्षण विभागाकडून समितीची स्थापना
10th exam, 12th exam, Maharashtra state board ,
राज्य मंडळाचा मोठा निर्णय… दहावी, बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्यास केंद्रांची मान्यता कायमस्वरुपी रद्द
state education department big decision vanish blank pages textbooks
शिक्षण विभागाचा मोठा निर्णय, पाठ्यपुस्तकांतून वह्यांची कोरी पाने हद्दपार
This years Maharashtra State Board exams include changes in grace marks awarding process
बोर्डाच्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या ‘ग्रेस’ गुणांबाबत मोठा निर्णय…
BMC cbse and icse school 10th class exams news in marathi
पालिकेच्या सीबीएसई आणि आयसीएसई शाळेचे विद्यार्थी प्रथमच दहावीची परीक्षा देणार, पालिकेच्या शिक्षण विभागाची कसोटी
Changes in the format of the NEET question paper
‘नीट’च्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरुपात बदल

राज्याच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जास्तीत जास्त विद्यार्थी नोंदणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कार्यक्रमाची माहिती सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनांच्या शाळापर्यंत पोहोचवून अधिकाधिक विद्यार्थी, पालकांना सहभागी होण्यासाठीच्या सूचना क्षेत्रिय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मात्र, मंत्रालयाच्या सूचनेनुसार जास्तीत जास्त विद्यार्थी नोंदणी करणे हे कठीण काम आहे. प्रत्येक जिल्ह्यातील एकूण पटाच्या ५० टक्के विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा : पोषण आहारात धान्याचा ठणठणाट, शिक्षकांचे कपाळावर हात!

राज्यात पवित्र संकेतस्थळाद्वारे शिक्षक भरती प्रक्रियेचे काम सुरू आहे. त्याशिवाय ‘मुख्यमंत्री माझी शाळा’ हे राज्यव्यापी अभियानही राबवण्यात येत आहे. त्यात परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचीही भर पडली आहे. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी नोंदणीसाठी दैनंदिन माहिती संकलन, पाठपुरावा करावा लागत असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Story img Loader