पुणे : सध्याच्या काळात महात्मा गांधींच्या अहिंसेच्या मार्गावर चालण्याची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात वेगळेच चित्र दिसते. पुण्यात कोयता गँगची मोठी दहशत आहे, असे मी ऐकले. दहशत पसरवणे हे लोकशाहीला घातक आहे. त्यामुळे या कोयता गँगला ठोकून काढा, असे मी पोलिसांना सांगणार आहे, असे उद्योगमंत्री उदय सामंत रविवारी म्हणाले.

जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) पुणे विभागाच्या वतीने रविवारी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंत्री सामंत बोलत होते. या कार्यक्रमात जीवनगौरव पुरस्कार मिलिंद फडे यांना देण्यात आला. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ एस.के. जैन, जितोचे अध्यक्ष राजेशकुमार सांकला, उपाध्यक्ष विजय भंडारी आदी उपस्थित होते.

After Baba Siddiquis murder Mumbai Police held special meeting to review for vip security
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचा फेरआढावा, बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर पोलिसांच्या संरक्षण, सुरक्षा विभागाची विशेष बैठक
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
violence against women, Three-faced Ravan burnt,
महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा निषेध, पुण्यात शरद पवार गटाकडून तीन तोंडी रावणाचे दहन
dcm devendra fadnavis virtually inaugurated Bolinj police Station in virar
आयुक्तालयातील १९ व्या पोलीस ठाण्याची निर्मिती; बोळींज पोलीस ठाण्याचे गृहमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन
dhangar reservation issue
आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाज आक्रमक; आंदोलकांनी मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून सुरक्षा जाळीवर मारल्या उड्या
Bhoomipujan municipal development works Mumbai,
मुंबई : आचारसंहितेपूर्वी महापालिकेच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी कार्यक्रमांचा धडाका
Abdul sattar
Video: आर्थिक व्यवहाराच्या आरोपाने मंत्री अब्दुल सत्तार संतापले; बाजार समित्यांच्या परिषदेतून काढता पाय
Shiv Sena Yuva Sena Secretary Dipesh Mhatre
शिवसेना युवासेना सचिव दिपेश म्हात्रे यांना जीवे ठार मारण्याची धमकी, फलकांवरुन जबाब देण्यासाठी शक्तिप्रदर्शन करत पोलीस ठाण्यात

हेही वाचा >>> पुणे : रिक्षाचालकाला दमदाटी करुन रिक्षा चोरली, भवानी पेठेतील घटना

सामंत म्हणाले की, सध्याच्या काळात एकत्र येऊन निर्णय घेणे आवश्यक आहे. राजकारणात दिवसेंदिवस हुकूमशाही वाढत आहे. राजकीय पक्षात लोकशाही असती, तर आम्हाला गुवाहाटीला जावे लागले नसते. तुम्ही एखाद्याला मान देता, तेव्हा तो तुम्हाला त्याची मान देतो. मात्र, तुम्ही मान दिला नाही, तरी तो माणूसही कधीतरी मोठा होतो. त्यावेळची स्थिती खूप वेगळी असते आणि त्याचे पडसादही खूप वेगळे असतात. सर्वांनाच ते राज्याच्या राजकारणात पाहायला मिळाले. 

संजय राऊत यांच्यावर निशाणा

जैन समाजातील चार संघटना एकत्र येऊन चांगले काम करीत आहेत. राजकारणात असे घडत नाही आणि त्याचे परिणामही आपल्याला समोर दिसतात. सकाळी उठून टिव्ही लावला की, शिवीगाळ करायचा शो लागतो, अशी टीका सामंत यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.