पुणे : राज्य शासनाने शिक्षण हक्क कायद्यातील (आरटीई) २५ टक्के आरक्षण प्रवेश प्रक्रियेत केलेल्या बदलांविरोधात या पूर्वीच उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. त्याशिवाय पुण्यातून अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेनेही जनहित याचिकेद्वारे न्यायालयात आव्हान दिले असून, राज्य शासनाच्या ९ फेब्रुवारी २०२४ च्या राजपत्राद्वारे घेतलेल्या निर्णयाला स्थगिती, ९ फेब्रुवारी २०२४ चे राजपत्र मागे घेऊन विनाअनुदानित शाळांना पूर्वीप्रमाणे २५ टक्के आरक्षणाची तरतूद लागू करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

समाजवादी अध्यापक सभेचे कार्यकारी अध्यक्ष शरद जावडेकर, २५ टक्के आरक्षण पालक संघाच्या अध्यक्ष सुरेखा खरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेसह शिवाजी तलवारे, राहुल बनसोड, संदीप पाटील हे तीन पालकही याचिकेतील अर्जदार आहेत. राज्य शासनाच्या निर्णयामुळे संविधानातील तरतुदींचा भंग होत आहे. समाजवादी अध्यापक सभेच्या याचिकेसह मुव्हमेंट फॉर पिपल्स जस्टिस, पुणे आणि नागपूर येथील जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात एकत्र करण्यात आल्या आहेत. या याचिकांबाबतची सुनावणी ८ मे रोजी होणार आहे.

cm Devendra fadnavis marathi news
Supriya Sule : राज्य सरकारवर खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या…!
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
question arises if the second term of election wasted former corporators and aspirants
दुसरी टर्मही वाया जाणार ? निवडणुकांवरची सुनावणी लांबल्याने अनेकांच्या पोटात गोळा
aditi tatkare
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे ३० लाख अर्ज बाद होणार? आदिती तटकरे म्हणाल्या, “ऑक्टोबरमध्ये…”
teachers oppose copy free campaign
विश्लेषण : कॉपीमुक्त अभियानातील नव्या निर्णयाला शिक्षकांचा विरोध का?
Nitish Kumar and Chandrababu Naidu on UGC
यूजीसीच्या मसुद्यावरून एनडीएमध्ये अस्वस्थता; जेडीयूची स्पष्ट नाराजी, तर टीडीपी, लोजपकडून सावध पवित्रा
Devendra Fadnavis in Davos while Shiv Sena voices frustration over Mahayuti's district guardianship dispute.
Shiv Sena : मुख्यमंत्री परदेशात असताना महायुतीतील तणाव वाढला, पालकमंत्रीपदावरून पडली ठिणगी; शिवसेनेच्या नाराजीची कारणे काय?
Sunil Tatkare On Raigad Guardian Minister
Sunil Tatkare : रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय स्थगित केल्यानंतर सुनील तटकरेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “मुख्यमंत्री आल्यानंतर…”

हेही वाचा…‘आरटीई’ प्रवेशांच्या नोंदणीसाठी मुदतवाढ… कधीपर्यंत भरता येणार अर्ज?

शिक्षण हक्क कायदा २००९ मध्ये विविध पार्श्वभूमीची मुले एकत्र शिकल्यास त्यांच्या क्षमतांचा जास्त विकास होईल असे म्हटले आहे. पूर्वी समान शाळा, समान परिसर असे शब्द वापरले जायचे. आता समावेशक शिक्षक म्हटले जाते. २५ टक्के आरक्षणाची भूमिका संविधानातील बंधुता, सामाजिक न्याय, समान संधी यांच्याशी सुसंगत आहे. चांगल्या दर्जाचे शिक्षण उपेक्षित, मागास, वंचित मुलांना देण्याची जबाबदारी केवळ सरकारी शाळांची नाही, तर सरकारी अनुदान मिळत नसलेल्या शाळांचीही आहे, असे जावडेकर, खरे यांनी सांगितले.

Story img Loader