लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: अतिवृष्टी, पूर, वादळी पाऊस, विजा अशा कारणांनी गेल्या वर्षभरात देशभरात २ हजार ७७० जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी १ हजार ५८० मृत्यू विजा आणि वादळी पावसामुळे झाले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यात सर्वाधिक ५८० मृत्यू उत्तर प्रदेशमध्ये झाले असून, महाराष्ट्रात २४० मृत्यू झाले.

Chennai Air Force Show
Chennai Air Force Show : चेन्नईमध्ये एअर शो पाहण्यासाठी लाखोंची गर्दी; पाच जणांचा मृत्यू, २३० जणांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
man dies in kerala hospital after treated by fake doctor
धक्कादायक! १२ वर्षांपासून एमबीबीएसची परीक्षा उत्तीर्ण करू न शकणाऱ्या बोगस डॉक्टरकडून रुग्णावर उपचार; ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
Territorial Battles Lead to t9 Tiger Deaths in Nagzira Reserve
विश्लेषण : वर्चस्वाची लढाई नागझिऱ्यातील वाघांसाठी धोकादायक?
66 people died in floods in Nepal
नेपाळमधील पुरात ६६ जणांचा मृत्यू, ७९ बेपत्ता
Police died falling from local, Mumbai local,
मुंबई : गर्दीमुळे लोकलमधून पडून पोलिसाचा मृत्यू
80 people died in police custody in the state
राज्यात ८० जणांचा पोलीस कोठडीत मृत्यू, गेल्या पाच वर्षांत देशभरात ६८७ जण दगावले
nagpur ambazari lake overflowed flood situation completes one year
नागपूरच्या महापुराची वर्षपूर्ती! भय इथले संपत नाही…

भारतीय हवामान विभागाच्या हवामान संशोधन आणि सेवा विभागाने २०२२चा हवामान अहवाल नुकताच जाहीर केला. या अहवालात गेल्या वर्षभरातील पाऊस, तापमानासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.

आणखी वाचा- पुणे: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता

गेल्या वर्षभरात कर्नाटकात सर्वाधिक पाऊस पडला. कर्नाटकात दीर्घकालीन सरासरीच्या १३८ टक्के पावसाची नोंद झाली. त्या खालोखाल राजस्थानमध्ये १३६ टक्के, तेलंगणात १३५ टक्के पाऊस पडला. त्यावेळी ईशान्येकडील राज्यांमध्ये कमी पाऊस झाल्याचे दिसून येते. मिझोराममध्ये केवळ ७४ टक्के आणि मणिपूरमध्ये ७५ टक्के पाऊस पडला. गोवा, गुजरात आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये वार्षिक सरासरीच्या अधिक पावसाचा कल दिसून येत आहे. तर अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि बिहारमध्ये कमी पावसाला कल दिसून येत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या अहवालातील माहितीनुसार २०२२मध्ये देशभरात झालेल्या २ हजार ७७० मृत्यूंपैकी १ हजार ५८० मृत्यू विजा आणि वादळी पावसामुळे झाला. १ हजार ५० मृत्यू पूर आणि अतिवृष्टीमुळे झाले. तर उष्णतेची लाट, धुळीचे वादळ अशा कारणांनी अन्य मृत्यू झाले. उत्तर प्रदेशमध्ये ५८९, बिहारमध्ये ४१८, आसाममध्ये २५८, महाराष्ट्रात २४०, ओडिशामध्ये १९४ मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

आणखी वाचा- पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बिबट्या ठार, पळसदेव नजीक अपघात

तापमानात वाढ

गेल्या शंभर वर्षातील तापमानाच्या तुलनेत देशभरातील काही राज्यांतील तापमानातही लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात सर्वाधिक १.५ अंश सेल्सियस तापमान हिमाचल प्रदेशात वाढले. त्या खालोखाल गोव्यात १.४४ अंश सेल्सियस, केरळमध्ये १.०५ अंश सेल्सियस तापमान अधिक नोंदवले गेले.