देशातील युवकांच्या बौद्धिक क्षमता आणि कार्यकुशलतेवर भारत महासत्ता होईल, असा विश्वास लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी व्यक्त केला. 

एमआयटी स्कूल ऑफ डिझाइनच्या नव्या इमारतीचे उद्घाटन बिर्ला यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष राहुल कराड, डॉ. मंगेश कराड, खासदार श्रीनिवास पाटील, एशियन हेरिटेज फाऊंडेशनचे अध्यक्ष राजीव पाटील, डॉ. प्रकाश जोशी, कुलगुरू डॉ. रवीकुमार चिटणीस आदी या वेळी उपस्थित होते. 

Sharad Pawars big statement about increasing oppression of women
महिलांवरील वाढत्या अत्याचाराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
Amit Shah Nitin Gadkari Deputy Chief Minister Devendra Fadnavis Chandrasekhar Bawankule lead for Assembly elections 2024 in bjp
तिहेरी नेतृत्व; विधानसभेसाठी भाजपची धुरा गडकरी, फडणवीस, बावनकुळेंकडे
Due to lack of trust in Devendra Fadnavis and Chandrashekhar Bawankule department wise meetings of party leaders says Jayant Patil
फडणवीस, बावनकुळेंवर विश्वास नसल्याने दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या विभागनिहाय बैठका, जयंत पाटील यांचा चिमटा
Discussion between Prime Minister Narendra Modi and US President Joe Biden during the Quad summit
मोदी, बायडेन द्विपक्षीय चर्चा; हिंदप्रशांत सागरी प्रदेशासह जागतिक आणि प्रादेशिक मुद्दे उपस्थित
Joe Biden maintains Donald Trumps India-policy and takes it to the heights
बायडेन यांनी ट्रम्प यांचे भारत-धोरण राखले आणि उंचीवर नेले…
Narendra Modi in jharkhand
“झारखंडमध्ये घुसखोरीला प्रोत्साहन!”, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्ताधारी ‘जेएमएम’वर आरोप
prashant kishor on bihar liquor ban
“बिहारमध्ये सत्ता आल्यास, तासाभरात दारुबंदी उठवू”; जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष प्रशांत किशोर यांची घोषणा

हेही वाचा >>> पुणे : वैकुंठ स्मशानभूमीत अघोरी कृत्य ; दोन तृतीयपंथीय अटकेत; विश्रामबाग पोलिसांकडून गुन्हा

बिर्ला म्हणाले, की, जगात जे काही मोठे परिवर्तन झाले, ते तरुणांमुळे झाले. भविष्यातील पिढ्या परिश्रम, बौद्धिक क्षमतांद्वारे देशाच्या जडणघडणीत योगदान देत आहेत. नेतृत्त्व म्हणजे राजकारण नाही. प्रत्येक क्षेत्रात नेत्तृत्त्व आवश्यक असते. सामाजिक, आर्थिक, व्यक्तिगत, आध्यात्मिक आयुष्यात नेतृत्त्वाची क्षमता असायला हवी. नेतृत्त्वगुण निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. चांगले नेतृत्त्व असल्यास प्रशासनही चांगले चालते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने देशाला सक्षम नेतृत्त्व लाभले आहे. त्यांच्या नेतृत्त्वाखाली देश विकसित राष्ट्र होईल.

आपल्या देशाला स्वातंत्र्यानंतर लोकशाही मिळालेली नाही. त्यापूर्वीपासूनच आपल्याकडे लोकशाही होती. गावागावांमध्ये सामूहिक निर्णय घेतले जात होते. आपला देश मदर ऑफ डेमोक्रसी आहे. हे जगापुढे मांडले पाहिजे, असेही ते म्हणाले. योग पद्धतीकडे संपूर्ण जग वळले आहे. हेच विज्ञान, तंत्रज्ञान, नवसंशोधन अशा प्रत्येक क्षेत्रात घडण्याची आवश्यकता आहे. जगात भारत आघाडीवर असला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.