काही वर्षांपूर्वी पुण्याच्या मध्यवर्ती भागातील एका रस्त्यावर एक फलक झळकला होता, ‘मी येतोय…’ या फलकावरून शहरात भरपूर चर्चा रंगली होती. ‘हे कुणी लावले असेल’, ‘यात काही राजकीय संदेश आहे का,’ असेही प्रश्न उपस्थित झाले होते. अर्थात, काही दिवसांतच या फलकाचा उलगडा झाला. हा एका गणेश मंडळाचा फलक होता आणि गणेशोत्सव दोन महिन्यांवर असतानाच त्यांनी हा फलक लावून त्याबद्दल उत्सुकता निर्माण केली होती. पुणेकरांचे गणेशोत्सवावरील प्रेम हे असे आहे. या मंडळाने तर उत्सवापूर्वी दोन महिने फलक लावला होता; पण गणेशोत्सवात रमणारे अनेक कार्यकर्ते असे आहेत, की अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशीच त्यांची पुढच्या वर्षीच्या उत्सवाची तयारी सुरूही झालेली असते! समाज जोडणारा, कार्यकर्ता घडविणारा आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मनामनांत आनंद पेरणारा असा हा उत्सव. लाडक्या गणरायाच्या प्रसन्न मूर्तीसमोर हात जोडून नतमस्तक झालेला भाविक डोळे बंद करून तल्लीन होऊन त्याच्याकडे त्याचे जे काही असेल, ते मागणे मागतो, त्याच्या आगमनाचा जल्लोष करतो, त्याची आरती गातो, सर्जनशीलतेला उपक्रमशीलतेची जोड देतो, देखाव्यांमधून सामाजिक-राजकीय प्रश्नांवर अभिव्यक्त होतो आणि विसर्जनाच्या वेळी भावुकही होतो. या सगळ्यांतील निरागसता हे या उत्सवाचे खरे संचित.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा