जालनामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमारा केल्यानंतर अवघ्या महाराष्ट्रात पोलीस आणि सरकारच्या विरोधात रोष निर्माण झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे हे उपोषणास बसले होते. याच उपोषणादरम्यान पोलिसांनी तेथील मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांवर आणि नागरिकांवर लाठीमारा केला होता. या घटनेचा अवघ्या महाराष्ट्रातून निषेध केला जात आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी बंद पुकारण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि मावळ या ठिकाणी देखील कडकडीत बंद पाळण्यात आला असून अत्यावश्यक सेवा आणि शाळा कॉलेज वगळता सर्वकाही बंद असल्याचं निदर्शनास आले.

आणखी वाचा-गणेशोत्सवासाठी वर्गणी न दिल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात राडा

Gen Z and the Lost Art of Conversation
तब्बल पाच हजार वर्षांचा इतिहास असलेला थेट मानवी संवाद हरवतोय? नेमके काय घडते आहे?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
share market update bse nifty share bazar stock market
Marker roundup : ‘सेन्सेक्स’मध्ये सलग दुसऱ्या सत्रात मजबूत ६३१ अंशांची भर; दलाल स्ट्रीटवरील आजच्या तेजीमागील दडलंय काय?
Agriculture Minister Adv Manik Kokate blames that producer Herbicide company is responsible for loss of onion
कांद्याच्या नुकसानीला प्रथमदर्शनी उत्पादक कंपनी जबाबदार; कृषिमंत्र्यांचा ठपका
property tax defaulters in pune news in marathi
अभय योजनेचा फायदा घेणारेच झाले पुन्हा थकबाकीदार, नक्की प्रकार काय ?
Human or technical error in explosion what is method of handling explosives
मानवी चूक की तांत्रिक, स्फोटक हाताळण्याची पद्धती काय आहे?
niv test reveals the root cause of rare guillain barre syndrome disorder
‘एनआयव्ही’च्या तपासणीतून अखेर दुर्मीळ ‘जीबीएस’ विकाराचे मूळ कारण उघड; कशामुळे धोका जाणून घ्या…
Koregaon Park private company, embezzlement ,
पुणे : खासगी कंपनीतील रोखपालाकडून दोन कोटींचा अपहार

मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून गेल्या अनेक वर्षापासून मराठा बांधवांचं आंदोलन सुरू आहे. जालनामध्ये मनोज जरांगे हे मराठा बांधवांना आरक्षण मिळावं म्हणून उपोषणासाठी बसले होते. जरांगे यांची तब्येत खालावत असल्याने अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केला होता. तेव्हाच पोलीस आणि मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन समोरासमोर आले. पोलिसांनी मराठा बांधवांवर लाठीमारा केला. यामुळे अवघ्या महाराष्ट्रात राजकारण ढवळून निघालं आहे. अशातच या घटनेचा निषेध करण्यासाठी आज महाराष्ट्राच्या विविध भागात बंदची हाक देण्यात आली आहे. पर्यटननगरी म्हणून ओळख असलेल्या लोणावळ्यात देखील मराठा समाज रस्त्यावर उतरला होता. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. लोणावळ्यासह मावळात देखील कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी सर्व व्यवहार ठप्प होते. शाळा, कॉलेज आणि अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद करण्यात आलं. सर्व स्तरातून जालन्यातील घटनेच्या निषेध करण्यात येत आहे.

Story img Loader