कोणी कितीही एकत्र आलं तरी महाविकास आघाडीच आगामी निवडणुका जिंकणार असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शिवसेना (शिंदे गटाच्या) नेत्यांनी कितीही पोपटपंची केली तरी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही. उलट, शिंदे गटाच विसर्जन होईल अशी टीका देखील त्यांनी केली आहे.

हेही वाचा >>> पुणे: अमली पदार्थ विक्री प्रकरणात महिलेसह दोघांना अटक

emand for an inquiry into pm narendra mondis allegations against Rahul Gandhi was rejected
अदानी-अंबानींनी टेम्पो भरून पैसे पाठवल्याचे वक्तव्य, पंतप्रधान मोंदींच्या राहुल गांधीवरील आरोपांच्या चौकशीची मागणी फेटाळली
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
cbi anil Deshmukh marathi news
सीबीआयकडून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह पोलीस उपायुक्त, निवृत्त सहाय्यक आयुक्तांवर गुन्हा
Jarange agitation, Mahavikas Aghadi,
जरांगे यांचे आंदोलन महाविकास आघाडीच्या फायद्यासाठी – राजेंद्र राऊत
Balasaheb Thorat, Gulabrao Patil, Finance Minister,
महायुतीने राज्य बरबाद करण्याचे काम केले, अर्थमंत्र्यांबाबत मंत्री गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याचे मी समर्थन करतो – बाळासाहेब थोरात
BJP,NCP,SHIV SENA,mahayuti
रामटेकमध्ये शिंदे गटाच्या जयस्वालांचे काम करण्यास भाजप पदाधिऱ्यांचा नकार का?
Prime Minister Narendra Modi assertion of support for developmental policy in Brunei
विकासात्मक धोरणाला पाठिंबा; ब्रुनेई येथील भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
Bhagyashree Dharmarao Atram is an election candidate from Sharad Pawar group against Dharmarao Baba
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांविरोधात त्यांच्या कन्येला उमेदवारी, अनिल देशमुखांनी स्पष्टच सांगितले…

विनायक राऊत म्हणाले, महाविकास आघाडी आगामी प्रत्येक निवडणूक जिंकणारच. कोणी कितीही एकत्र येऊ द्या. महाविकास आघाडीच पुढे असेल. उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांच्या माध्यमातून आम्ही निवडणुका लढणार आहोत. पुढे ते म्हणाले की, शिंदे गटाचा मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही. त्यांनी किती पोपटपंची करू द्या. भाजप मंत्रिमंडळ विस्तार करू देणार नाही.

हेही वाचा >>> पुणे: चंदननगर भागात सोसायटीच्या आवारातील रोहित्राला आग 

एकनाथ शिंदे गटाच्या विसर्जनाची सुरुवात झाली आहे. पुढे ते म्हणाले की, गद्दारी करणाऱ्या नेत्यांना पुन्हा पक्षाचे दरवाजे उघडणार नाहीत. त्यांच्यासाठी पक्षाचे दरवाजे बंदच राहतील. त्यांना भाजप धडा शिकवीन अशा गद्दारी आणि बेइमानी करणाऱ्या व्यक्तींना आम्ही कधीच जवळ करणार नाही. असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं अस विनायक राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिकांनाच पुढे घेऊन जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.