पुणे मेट्रोच्या वनाझ ते रुबी हॉल मार्गावरील सेवेला सोमवारी (ता. १४) ब्रेक लागला होता. वीजपुरवठा खंडित झाल्याने सेवा २० मिनिटे ठप्प झाली होती. याप्रकरणी महामेट्रोने महापारेषणकडे बोट दाखविले होते. आता महापारेषणने महामेट्रोच्या तांत्रिक चुकीमुळे वीजपुरवठा खंडित झाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे मेट्रोची बत्ती नेमकी कोणामुळे गुल झाली, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा >>> मंत्री हसन मुश्रीफ थेट ससून रुग्णालयात येतात तेव्हा…

contractors warn to stop work for rs 90 thousand crores outstanding of development works during the election period
निवडणूक काळातील विकासकामांची ९० हजार कोटींची थकबाकी; कामे थांबविण्याचा ठेकेदारांचा इशारा
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
४१ इमारतींवरील कारवाईला वेग ,एकाच दिवसात ४ इमारती जमीनदोस्त
dilapidated railway bridge on Nagpur Chhindwara route will be opened
नागपूर – छिंदवाडा मार्गावरील खचलेला रेल्वे पुला सुरू होणार,मुहूर्त ठरला
Chhatrapati Sambhajinagar, water , arrears ,
छत्रपती संभाजीनगरमध्ये नळजोडणीची १२१ कोटींची थकबाकी
Despite government announcement smart prepaid meters are being distributed secretly causing unemployment for contract meter readers
राज्यभरात यंदा वीज देयक वेळेवर नाही… संतप्त कंत्राटी मीटर वाचक…
central railway cancelled 400 local trains
मध्य रेल्वेचा बोजवारा, सहा दिवसांत ४०० लोकल रद्द; ६५० लोकल विलंबाने
ग्रामीण भागात घरफोडी करणारा चोरटा गजाआड; चोरट्याकडून १६ लाखांचा ऐवज जप्त

मेट्रोच्या वनाझ ते रुबी हॉल मार्गावरील वीजपुरवठा १४ ऑगस्टला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास खंडित झाला होता. त्यामुळे या मार्गावरील सेवा बंद झाली. सर्व मेट्रो गाड्या स्थानकावर २० मिनिटे उभ्या होत्या. या मार्गावरील वीजपुरवठा सुरळीत करण्यास सुमारे २० मिनिटांचा कालावधी लागला. त्यानंतर या मार्गावरील सेवा पूर्ववत झाली होती. याप्रकरणी महामेट्रोने महापारेषणकडे बोट दाखविले होते. मात्र यावर खुलासा करीत हा सर्व प्रकार मेट्रोचीच चूक असल्याचे महापारेषणने म्हटले आहे. महामेट्रोचे वीज उपकेंद्र रेंजहिल्स येथे आहे. तेथील ट्रान्सफॉर्मरची देखभाल व दुरुस्ती सुरू होती. हे काम त्रयस्थ संस्थेला देण्यात आले आहे. या संस्थेच्या तंत्रज्ञाकडून चूक झाली आणि वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे मेट्रो सेवा ठप्प झाली. नंतर त्यांनीच हा वीजपुरवठा सुरळीत केल्याने मेट्रोसेवा पूर्ववत सुरू झाली, असे महापारेषणने म्हटले आहे. या निमित्ताने दोन सरकारी यंत्रणांमधील विसंवाद समोर आला आहे. त्याचबरोबर नेमकी चूक कोणाची, असा प्रश्नही निर्माण झाला आहे.

Story img Loader