पुणे : नव्या वर्षाच्या सुरुवातीस निर्माण झालेले ढगाळ वातावरण निर्माण होऊन अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले होते. हे सावट दूर होऊन राज्यभरात कोरडे वातावरण निर्माण झाले असले तरीही राज्याला अपेक्षित थंडीची प्रतिक्षा कायम आहे. पुढील आठवड्यात किमान तापमानाचा पारा फारसा खाली जाण्याची शक्यता नाही.

हेही वाचा >>> मध उत्पादन क्षेत्रात सावळा गोंधळ; मधपाळ, मध उत्पादनाची आकडेवारी नाही

rain Maharashtra, monsoon Maharashtra,
यंदाच्या पावसाळ्यात राज्यात किती पाऊस पडला ? जाणून घ्या, सर्वात कमी, सर्वात जास्त पाऊस कुठे झाला
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
sea level rising reason (1)
समुद्राची पातळी वेगानं वाढण्याची कारणं काय? जगातील कोणत्या भागांना सर्वाधिक धोका?
yamuna taj mahal cracks heavy rain
ताजमहालचं वैभव धोक्यात; भिंतींना तडे, पाण्याची गळती अन् बरंच काही, नुकसानाची व्याप्ती किती?
bjp to contest 9 seats less in vidarbha
Mahayuti Seat Sharing Deal : भाजपला बालेकिल्ल्यातच हक्काच्या जागांवर पाणी सोडावे लागणार ?
firecrackers banned in delhi
‘या’ राज्यात फटाक्यांवर पूर्णपणे बंदी; कारण काय? फटाक्यांमुळे शरीराचे किती नुकसान होते?
Due to heavy rains production of custard apple in Maharashtra has decreased by up to 30 percent Pune news
अतिवृष्टीचा सीताफळाला फटका बसला? जाणून घ्या, जुलै महिन्यातील पावसामुळे काय झालं
loksatta analysis, Jayakwadi Dam water use
विश्लेषण : जायकवाडी भरूनही मराठवाड्याला फायदा काय? समन्यायी पाणीवाटपाचा मुद्दा अजूनही का अनुत्तरित?

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम हिमालयीन भागात पश्चिमी विक्षोपाचा म्हणजे थंड वाऱ्याच्या प्रवाहाचा प्रभाव राहणार आहे. मात्र, त्याचा राज्यावर परिणाम होण्याची शक्यता नाही. राज्यावर सध्या कोणतीही हवामान विषयक प्रणाली सक्रीय नाही. त्यामुळे राज्यात सध्या कोरडे वातावरण आहे. पुढील आठवड्यातही कोरडे वातावरण कायम राहण्याचा अंदाज आहे. किमान तापमानात एक-दोन अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज आहे. सोमवारी जळगावात राज्यात सर्वात कमी किमान ९.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल औरंगाबादमध्ये १०.२, नाशिकमध्ये ११.१, नगरमध्ये ११.५ आणि यवतमाळमध्ये १२.० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भात किमान तापमान सरासरी १३.०, मराठवाड्यात १४.०, मध्य महाराष्ट्रात १३.० आणि किनारपट्टीवर २०.० अंश सेल्सिअस राहिले.