पुणे : राज्यात पावसाने आठवडाभरापासून ओढ दिल्याने तापमानात वाढ होऊन पुन्हा उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. त्यामुळे पेरण्या पुन्हा खोळंबल्या आहेत. मंगळवार (१८ जून) अखेर राज्यात सरासरीच्या तुलनेत फक्त ५.६९ टक्के पेरण्या झाल्या असून, पावसाने अल्पविश्रांती घेतल्याने शेतकरी पेरण्यांबाबत संभ्रमात पडले आहेत.

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मागील पाच वर्षांची सरासरी पाहता, १८ जूनअखेर राज्यात सरासरी १,४२,०२,३१८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होते. यंदा मंगळवार (१८ जून) अखेर राज्यात जेमतेम ५.६९ टक्के म्हणजे ८,०८,७९२ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

Radhakrishna Vikhe criticize Municipal Corporation on issue of water usage and recycling
जलसंपदामंत्र्यांच्या नाशिक महापालिकेला कानपिचक्या; पाणी वापर, पुनर्वापराचा मुद्दा
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Maharashtra temperature rise news in marathi
राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या, पुढील २४ तासात असे असेल तापमान
nashik jaljeevan mission aims to provide 55 liters of clean water daily
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव जिल्ह्यातच ‘जलजीवन मिशन’ संकटात, चार वर्षात केवळ २९४ योजना पूर्ण
pavana dam
पिंपरी : उन्हाचा चटका वाढला; पवना धरणात किती आहे पाणीसाठा?
592 crores assistance to those affected by natural disasters
नैसर्गिक आपत्ती बाधितांना ५९२ कोटींची मदत, राज्यातील ५.४० लाख शेतकऱ्यांना दिलासा
nashik water news marathi
नाशिक जिल्ह्यात ३५७ गावांत वैयक्तिक विहिरी, विंधनविहिरींवर बंदी; १५ पाणलोट क्षेत्रात भूजलाचा बेसुमार उपसा
Ambuja Cements Maratha Limestone mine in Lakhmapur Korpana taluka will cause severe pollution affecting nearby villages
चंद्रपूर : अंबुजा सिमेंटच्या लाईमस्टोन खाणीमुळे प्रदूषणात वाढ; दहा ते पंधरा गावांना…

हेही वाचा…पुणे : अकरावी प्रवेशात विद्यार्थ्यांची पसंती कोणत्या शाखेला? तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर…

विभागनिहाय पेरणीचा विचार करता, छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांत सर्वांधिक सरासरीच्या तुलनेत ११.५५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्या खालोखाल नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्ये सरासरीच्या तुलनेत ११.४२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडलेल्या कोकण विभागात जेमतेम १.६६ टक्के, पावसाने ओढ दिलेल्या नागपूर विभागात ०.०८ टक्के, अमरावती विभागात ३.४९ टक्के, लातूर विभागात ५.१९ टक्के, कोल्हापूर विभागात ६.३२ टक्के आणि पुणे विभागात २.२० टक्के पेरण्या झाल्या आहेत.

कापसाची सर्वाधिक पेरणी

पीकनिहाय विचार करता, सरासरीच्या तुलनेत भात, बाजरी, रागी, तूर, उडीद आणि भुईमूगाची दोन टक्के, ज्वारी, अन्य तृणधान्यांची एक टक्का पेरणी झाली आहे. मक्याची सात टक्के, सोयाबीन आणि अन्य तेलबियांची पेरणी सरासरीच्या चार टक्केच झाली आहे. कापूस पिकाची सर्वांधिक ११ टक्के पेरणी. कापसाचे १८ जूनअखेर सरासरी क्षेत्र ४२,०१,१२८ हेक्टर असून, यंदा आजअखेर ४,७८,९५९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

हेही वाचा…रेल्वेत प्रवाशाला हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा… मुंबई – कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील घटना

विभागनिहाय पाऊस, पेरणी स्थिती

कोकण – सरासरीपेक्षा कमी पाऊस, भाताचे तरवे जगविण्यासाठी धडपड.
मध्य, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा – सरासरीपेक्षा जास्त पाऊस. पण, मागील आठ दिवसांपासून पावसाचा खंड. कापूस, सोयाबीन लागवड रखडली.

विदर्भ – सरसरीपेक्षा कमी पाऊस. जमिनीच्या मशागती, बियाणांची तजवीज करून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत.

Story img Loader