पुणे : राज्यात शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आल्याने त्या माध्यमातून आवश्यक आणि पात्र शिक्षक उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे राज्यातील दहा आणि दहापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये डी.एड., बी.एड. पात्रताधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती देण्याचा शासन निर्णय रद्द करण्यात आला आहे.

शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. दहा आणि त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डी.एड., बी.एड. पात्रताधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती देण्यास शिक्षण विभागाने मान्यता दिली होती. नियमित शिक्षकांच्या नियुक्तीपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या दृष्टीने ही तात्पुरती व्यवस्था असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले होते. मात्र, २०२२ च्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील गुणांच्या आधारे करण्यात येणाऱ्या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा २० जानेवारीपासून सुरू झाला आहे. त्यामुळे आवश्यक अर्हताधारक व पात्र शिक्षक नियमित तत्त्वावर उपलब्ध होणार आहेत. ही वस्तुस्थिती विचारात घेऊन दहा आणि दहापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये कंत्राटी तत्त्वावर शिक्षक नियुक्तीचा शासन निर्णय अधिक्रमित करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

personal assistant Bhushan Gagrani nashik a person cheated unemployed people government job nashik
भूषण गगरानी यांचे स्वीय सहायक असल्याचे सांगून बेरोजगारांची फसवणूक, शासकीय नोकरीचे आमिष
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
alandi illegal warkari educational institutes
आळंदीतील अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांच्या तपासणीसाठी २० समित्यांची स्थापना; आज, उद्या तपासणी
Relief for teacher recruitment candidates Proposal submitted for TET exam
शिक्षक भरती उमेदवारांना दिलासा… ‘टेट’ परीक्षेसाठी प्रस्ताव सादर…
chairperson state women commission rupali chakankar on alandi unauthorized warkari educational institution
आळंदीतील अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांवर दोन दिवसांत करवाई करा; राज्य महिला आयोगाच्या सूचना
hinganghat zilla parishad
वर्धा : निलंबित शिक्षक पुन्हा निलंबित…
ews certificate
ईडब्ल्यूएस विद्यार्थांना राज्याच्या नमुन्यातच प्रमाणपत्र द्यावे लागणार
non creamy layer, UPSC , OBC , OBC Candidates job,
यूपीएससी उत्तीर्ण ओबीसी उमेदवार सरकारी अनास्थेचे बळी, हे आहे कारण

कंत्राटी तत्त्वावर तात्पुरती नियुक्ती देण्यात आलेल्या उमेदवारांची नियुक्ती त्यांच्या नियुक्तीचा कार्यकाल संपुष्टात येणे किंवा ते कार्यरत असलेल्या पदावर नियमित शिक्षकाची नियुक्ती होणे यांपैकी जे आधी घडेल, त्या कालावधीपर्यंत सुरू राहील. त्यानंतर त्यांना पुनर्नियुक्ती देता येणार नाही, असेही नमूद करण्यात आले आहे.

Story img Loader