पुणे : देशाला आत्मनिर्भर बनवताना दिव्यांगांना स्वयंपूर्ण बनवणे आवश्यक आहे. सामान्य आणि सक्षम व्यक्ती चुकीच्या पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून सेवेत प्रवेश करणार नाही याबद्दल दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना जागरूक राहावे लागेल. बनावट पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्र घेणारे आणि देणारे अशा दोघांवरही कायदेशीर कारवाई केली पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका राज्यपाल रमेश बैस यांनी मांडली.

दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत ‘सार्थक एजुकेशन ट्रस्ट’ या संस्थेच्या १६व्या स्थापना दिवस कार्यक्रमात बैस बोलत होते. मुंबईतील जागतिक व्यापार केंद्र येथे झालेल्या कार्यक्रमावेळी सेवानिवृत्त केंद्रीय सचिव लव वर्मा, सिडबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप वर्मा, सार्थकच्या सल्लागार मंडळाचे सदस्य क्रिशन कालरा व जागतिक व्यापार केंद्राचे अध्यक्ष विजय कलंत्री उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या ना नफा संस्थांसाठी असलेल्या सोशल स्टॉक एक्सचेंजवर ‘सार्थक’ संस्था सूचीबद्ध करण्यात आली.

tejpal wagh contribution in ganeshotsav mandal
कलागुणांना वाव देणारा गणेशोत्सव
land acquisition for pune chhatrapati sambhajinagar avoided due to assembly election
पुणे-छत्रपती संभाजीनगर महामार्गाचे भूसंपादन निवडणुकीमुळे टाळले?
Atharvashirsha Pathan, pune, traffic pune,
पुणे : अथर्वशीर्ष पठणानिमित्त मध्यभागात उद्या पहाटे वाहतूक बदल
attack on youth, Gultekdi, Pune, loksatta news,
पुणे : गुलटेकडीत किरकोळ वादातून तरुणावर कात्रीने वार, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाला अटक
pune ganesh utsav
Ganeshotsav 2024: ढोल-ताशांच्या निनादात गणरायाचे जल्लोषात स्वागत, मानाच्या गणपतींची विधिवत मुहुर्तावर प्रतिष्ठापना
kondhwa md drugs
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमली पदार्थ विरोधी विभागाची मोठी कारवाई; कोंढव्यातून ४० लाखांचे मेफेड्रोन, पिस्तूल जप्त
maharashtra sahitya parishad marathi news
प्रा. डॉ. सदानंद मोरे थेटच बोलले, “साहित्य संमेलनाध्यक्ष पदासाठीचे टोळीयुद्ध…”
kondhwa police arrested robbers
पुणे: कोंढव्यात दरोड्याच्या तयारीतील चोरट्यांची टोळी गजाआड; तीक्ष्ण शस्त्रे, दुचाकी जप्त
sp Pankaj deshmukh transfer postponed by cat
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या बदलीला स्थगिती

हेही वाचा : ‘आम्हाला स्वप्न पहायला वेळ नाही,’ दीपक केसरकर यांचा टोला

भारतात एकूण लोकसंख्येच्या २.२१ टक्के लोक दिव्यांग आहेत. आगामी जनगणना प्रथमच डिजिटल माध्यमातून होणार आहे. त्यामुळे देशातील दिव्यांगांची निश्चित संख्या समजेल. त्यानुसार त्यांच्या कल्याणासाठी योजना आखण्यास मदत होईल. तंत्रज्ञान आणि कृत्रिम प्रज्ञेमुळे आगामी काळात दिव्यांगांचे जीवन अधिक सुकर होऊन दिव्यांगता अडचण ठरणार नाही, असेही राज्यपालांनी सांगितले.