पुणे : राज्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने उष्माघाताचे प्रकार वाढू लागले आहेत. राज्यभरात उन्हाळ्यात आतापर्यंत उष्माघाताच्या १८४ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात सर्वाधिक २० रुग्णांची नोंद धुळे जिल्ह्यात झाली असून, पुण्यातही सहा रुग्ण आढळून आले आहेत. आगामी काळात रुग्णसंख्येत आणखी वाढ होण्याचा आरोग्य विभागाचा अंदाज आहे.

राज्यात १ मार्च ते २६ एप्रिल या कालावधीत उष्माघाताच्या १८४ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात सर्वाधिक २० रुग्ण धुळे जिल्ह्यातील आहेत. त्या खालोखाल ठाणे १९, नाशिक १७, वर्धा १६, बुलडाणा १५, सातारा १४, सोलापूर १३ आणि सिंधुदुर्ग १० अशी रुग्णसंख्या आहे. राज्यात यंदा उष्माघाताने मृत्यू झाल्याची नोंद नाही. राज्यात गेल्या वर्षी १ मार्च ते ३१ जुलै या कालावधीत उष्माघाताने २२ जणांचा मृत्यू झाला होता. त्यातील सर्वाधिक १३ मृत्यू औरंगाबाद जिल्ह्यातील होते, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

rising mortality rates in young adults post-corona in america
करोनानंतर अमेरिकेत तरुणांच्या मृत्यूदरात वाढ
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
weather forecast maharashtra Summer heat cold February maharashtra weather department
फेब्रुवारीपासूनच उन्हाच्या झळा, राज्यातील थंडी संपली? हवामान विभागाचा अंदाज काय?
state has 127 gbs patients with two deaths reported
‘जीबीएस’ची रुग्णसंख्या १३० अन् आतापर्यंत २ मृत्यू; आरोग्य सचिवांकडून यंत्रणांची झाडाझडती
Sasoon Hospital Pune.
‘GBS’मुळे आणखी एक मृत्यू, पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात नोंद; राज्यातील रुग्णसंख्या १२७ वर
patients , GBS , maharashtra, ventilator,
राज्यात एकाच दिवसात जीबीएसचे ९ रुग्ण! एकूण रुग्णसंख्या ११० वर; व्हेंटिलेटरवर १३ जण
unicef report observed that education of more than 54 7 million students has affected due to heat waves in India
उष्णतेच्या लाटांचा शिक्षणाला फटका; भारतातील ५ कोटी ४७ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे शिक्षण बाधित
number of Guillain Barre Syndrome GBS patients in state has reached 101 of which 16 patients are on ventilators
जीबीएसच्या रुग्णांत मोठी वाढ अन् एकाचा मृत्यू! रुग्णसंख्या शंभरपार; निम्म्याहून अधिक ‘आयसीयू’त

हेही वाचा : “पाणी वाटपासाठी महिलांना पैसे दिले” म्हणणाऱ्या रवी राणांना रोहित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “एवढा खर्च केला असेल, तर…”

शरीराचे तापमान हे बाहेरील वातावरणातील तापमानावर अवलंबून असते. परंतु काही वेळा बाहेरील तापमान वाढते तेव्हा शरीर तेच तापमान कायम राखण्यास सक्षम नसते. त्यामुळे घाम येण्याची यंत्रणा कोलमडून अतिप्रमाणात पाणी शरीराबाहेर उत्सर्जित होऊन भोवळ येते. तापमान ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असते तेव्हा अनेक जणांच्या बाबतीत असेच घडते. यापासून बचाव करण्यासाठी नियमित ३-४ लिटर पाणी प्यावे, सैलसर कपडे घालावेत, भरपूर द्रवपदार्थ प्यावेत. तापमान ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असेल तेव्हा शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. डोकेदुखी, थकवा या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असे डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉ. अक्षय धामणे यांनी सांगितले.

हेही वाचा : अमोल कोल्हेंना गावकऱ्यांचा विरोध! आढळराव म्हणाले, “कोल्हेंना तोंड दाखवायला…”

सर्वाधिक रुग्णसंख्या

  • धुळे – २०
  • ठाणे -१९
  • नाशिक – १७
  • वर्धा – १६
  • बुलडाणा – १५
  • सातारा – १४
  • सोलापूर – १३
  • सिंधुदुर्ग – १०

Story img Loader