पुणे : राज्यात मोसमी पाऊस सुरू झाल्यापासून ‘ऑरेंज अलर्ट,’ ‘यलो अलर्ट’ अनेकदा हवामान विभागाकडून देण्यात आला. मात्र आतापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा २७ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याची माहिती हवामान विभागाने दिली.

हेही वाचा >>> प्रवाशांसाठी खूषखबर! कागदी पिशव्यांना रेल्वेचा मोफत पर्याय; घरीही नेता येणार 

indusInd bank shares crash over 19 percent
इंडसइंड बँकेच्या समभागात १९ टक्क्यांची घसरण; देशातील अव्वल दहा बँकांमधूनही गच्छंती
Daily Horoscope 25th October in Marathi
Today’s Horoscope, 25 October : पंचांगानुसार आजचा शुभ…
imd predicted temperature will remain high in mumbai for the next two days
उकाडा, घामाच्या धारांनी मुंबईकर हैराण; दिवसा ऊन, संध्याकाळच्या पावसामुळे आर्द्रतेतही वाढ
Builders have an upbeat picture of rising home sales in the near future
पुण्या-मुंबईत घरांच्या खरेदीसाठी अच्छे दिन? बांधकाम क्षेत्र काय म्हणतंय जाणून घ्या…
Increase in 11th seats in Eklavya residential schools nashik news
एकलव्य निवासी शाळांमध्ये अकरावीतील जागांमध्ये वाढ
Sensex falls due to rising tensions in Gulf countries and equity sell off
समभाग विक्रीच्या तुफान माऱ्याने सेन्सेक्स ८२ हजारांखाली
Bhira, Navi Mumbai corporation, Bhira project,
नवी मुंबई : भिरा प्रकल्पाच्या पाण्यावर पालिकेचा दावा
rain Maharashtra, monsoon Maharashtra,
यंदाच्या पावसाळ्यात राज्यात किती पाऊस पडला ? जाणून घ्या, सर्वात कमी, सर्वात जास्त पाऊस कुठे झाला

यंदाच्या मोसमी पावसावर एल निनोचे सावट आहे. प्रशांत महासागरात एल निनो स्थिती निर्माण झाली आहे. एल निनो स्थितीमुळे मोसमी पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. मात्र हवामान विभागाच्या दीर्घकालीन अंदाजानुसार, देशात सरासरीइतकाच पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र त्यासाठी हिंदी महासागरातील इंडियन ओशन डायपोल (आयओडी) हा घटकही अनुकूल असणे आवश्यक आहे. अद्याप तशी स्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत नाही. देशभरात पाऊस पडत असला तरी त्याची तीव्रता दरवर्षीच्या तुलनेत कमी आहे.

हेही वाचा >>> पुणे: भारती विद्यापीठ भागात दहशत माजवणाऱ्या गुंड टोळीवर ‘मोक्का’ कारवाई

हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेच्या हवामान विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी ७ जुलैपर्यंतच्या पावसाची माहिती दिली. त्यानुसार आतापर्यंत देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. देशपातळीवर सरासरीपेक्षा तीन टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. तर राज्यात सरासरीपेक्षा २७ टक्के कमी पाऊस पडला आहे. सर्वसाधारणपणे ७ जुलैपर्यंत राज्यात २७७.७ मिलीमीटर पाऊस पडतो. मात्र यंदा २०३.८ मिलीमीटर पाऊस पडला. कोकण आणि गोव्यात सरासरीपेक्षा ३ टक्के, मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा ३१ टक्के, मराठवाड्यात सरासरीपेक्षा ३५ टक्के, विदर्भात सरासरीपेक्षा ४३ टक्के कमी पावसाची नोंद झाल्याचे डॉ. कश्यपी यांनी सांगितले. राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने त्याचा शेतीवर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या हंगामातील उर्वरित काळात तरी पावसाची सरासरी भरून निघणार का हा महत्त्वाचा प्रश्न आहे.