पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत केंद्र प्रमुख पदाच्या भरतीसाठी जून अखेरीला घेण्यात येणारी विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. काही शिक्षक व संघटनांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे परीक्षेबाबत प्रश्न निर्माण झाल्याने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

राज्यात केंद्र प्रमुखांची ४ हजार ८६० पदे मंजूर आहेत. त्यातील बहुतांश पदे गेल्या काही वर्षांपासून रिक्तच आहेत. मात्र केंद्र प्रमुखांची भरती करण्याची मागणी सातत्याने होत असल्याने राज्य शासनाने ५० टक्के पदे पदोन्नतीने, ५० टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यास मान्यता दिली. प्रत्यक्षात २ हजार ४३० जागा उपलब्ध होण्याची आवश्‍यकता असताना २ हजार ३८४ इतक्‍याच जागा भरतीसाठी उपलब्ध झाल्या. आयबीपीएस या कंपनीमार्फत जून अखेरीस परीक्षा घेण्याचे नियोजन परीक्षा परिषदेने केले होते. त्यासाठीची अधिसूचना प्रसिद्ध करून ऑनलाइन अर्जांसाठी १५ जूनची मुदत देण्यात आली. या परीक्षेसाठी ३३ हजार शिक्षकांनी नोंदणी केली.

big decision of Modi government, agriculture sector,
कृषी क्षेत्राबाबत मोदी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय जाणून घ्या, तिन्ही योजनांची सविस्तर माहिती
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
MPSC Agricultural Services, MPSC, court order,
‘एमपीएससी’ कृषी सेवा: न्यायालयाच्या आदेशानंतरही नियुक्ती देण्यास अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ?
2019 scholarship scheme helps meritorious students from marginalized groups study abroad
उपमुख्यमंत्री फडणवीसांनी बैठक घेताच ओबीसी समाजातील ७५ विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती मंजूर
Due to Union Home Minister Amit Shahs visit administration denied protest permission at golf club
नाशिक : प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांची निदर्शने
Mumbai Municipal Corporation, Clerk Post Recruitment,
लिपिक पदाच्या भरतीसाठी मुंबई महानगरपालिकेची पुन्हा जाहिरात, प्रचंड विरोधानंतर ‘ही’ अट वगळली
village extension officer arrested by acb while accepting bribe
नाशिक : जळगावमध्ये लाच स्वीकारताना ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघे जाळ्यात
selected for the post of MPSC exam passed officer the job of security guard has to be done
एमपीएससी’तून उपजिल्हाधिकारी, तहसीलदार पदावर निवड होऊनही करावे लागते सुरक्षा रक्षक, रिक्षा चालकाचे काम

हेही वाचा >>>पुणे: विदर्भात मोसमी पाऊस दाखल

जिल्हा परिषदांच्या तीन वर्षे अनुभव असलेल्या प्राथमिक शिक्षकांनाच ही परीक्षा देता येणार आहे. त्यातही परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी कमाल वयोमर्यादा ५० वर्षे निश्‍चित करण्यात आली. या अटींमध्ये सवलत देण्यासाठी काही शिक्षक, संघटनांनी उच्च न्यायालयाच्या मुंबई, औरंगाबाद, नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. याचिकाकर्त्यांना ऑफलाईन अर्ज करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार २५० जणांची अर्ज केले आहेत. आता अर्ज करण्यासाठीची सर्व प्रक्रिया थांबवण्यात आलेली आहे. परीक्षा परिषदेने शासनाकडून मार्गदर्शन सूचना मागविल्या आहेत. मात्र शासनाकडून त्यावर काहीच ठोस उत्तर अद्याप मिळालेले नाही.

हेही वाचा >>>धक्कादायक..! धावत्या रेल्वेतून उडी मारून १७ वर्षीय मुलीची आत्महत्या

केंद्र प्रमुख पदाच्या भरतीसाठी जूनच्या शेवटच्या आठवड्यात ऑनलाइन परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. मात्र या परीक्षेबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या आहेत. त्यामुळे प्रशासकीय कारणास्तव परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. परीक्षेचे सुधारित वेळापत्रक परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येणार आहे, असे परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी सांगितले.