अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पामुळे दक्षिणेकडील राज्यांत सध्या पाऊस होत असून, त्याचा परिणाम महाराष्ट्रातील दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही भागांत झाला आहे. या विभागात अंशत: ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, काही भागांत हलक्या सरींनी हजेरी लावली. पुढील दोन ते तीन दिवस पावसाळी स्थिती कायम राहणार आहे. विदर्भात मात्र हलकी थंडी राहणार आहे.

हेही वाचा >>> पुणे : बिबवेवाडीतील इंदिरानगर आगारात पीएमपी बसला आग; प्रवासी नसल्याने अनर्थ टळला

weather forecast maharashtra Summer heat cold February maharashtra weather department
फेब्रुवारीपासूनच उन्हाच्या झळा, राज्यातील थंडी संपली? हवामान विभागाचा अंदाज काय?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
pune highest temperature marathi news
Pune Temperature : जानेवारीतील सर्वाधिक तापमानाचा नवा विक्रम; उष्णता का वाढली?
Maharashtra hailstorm loksatta news
उत्तर महाराष्ट्रात गारपीट, हलक्या पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान विषयक स्थिती आणि इशारा
mumbai temprature today
Mumbai Temprature: मुंबईत तापमान सामान्य पातळीच्याही खाली, पण गारवा अल्पकाळासाठीच; वाचा काय आहे हवामान विभागाचा अंदाज!
weather department expressed possibility of increasing heat in Mumbai for next one or two days
मुंबईत उकाडा वाढण्याची शक्यता
rain of money through superstition and witchcraft in patur forest
अंधश्रद्धा व जादूटोण्यातून पैशांचा कथित पाऊस… पातूरच्या जंगलात नेमकं घडलं काय?
Temperature drop in Mumbai, Temperature ,
मुंबईच्या तापमानात घट

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे गेल्या आठवड्यात राज्यातील तापमानात मोठी घट झाली होती. २० आणि २१ नोव्हेंबरला राज्याच्या सर्वच भागातील किमान तापमानात ४ ते ६ अंशांनी घट होऊन थंडीचा कडाका वाढला होता. मात्र, उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह घटण्यासह दक्षिणेकडील राज्यात पावसाळी स्थिती निर्माण झाली. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र आणि कोकणात अंशत: ढगाळ वातावरणाची स्थिती तयार झाली. त्यामुळे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ होऊन थंडी गायब झाली. त्याचप्रमाणे दिवसाच्या कमाल तापमानात वाढ होऊन उन्हाचा चटकाही वाढला आहे. सध्या दक्षिण-पूर्व अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात वाऱ्यांची चक्रीय स्थिती आहे. या भागातून बाष्प येत आहे. त्यामुळे केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आदी भागांत पुढील तीन ते चार दिवस पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात त्याचा परिणाम दिसून येत आहे. दक्षिण कोकणात काही ठिकाणी शुक्रवारी पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्रात अनेक भागांत संध्याकाळी आकाश ढगाळ झाले होते. ही स्थिती पुढील दोन ते तीन दिवस कायम राहणार आहे.

Story img Loader