भीमाशंकरच्या निसर्गरम्य परिसरात वसलेल्या माळीण गावावर कोसळलेल्या दरडीच्या ढिगाऱयाखालून आतापर्यंत ३० मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. राज्याचे पुनर्वसनमंत्री पंतगराव कदम यांनी ही माहिती दिली. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. बुधवारपासून घटनास्थळी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे(एनडीआरएफ) जवान प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत आहेत. या दुर्घटनेतून ८ जणांना वाचवण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी सकाळी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. दरम्यान, माळीण गावातील लोकांचे पुनर्वसन कसे करायचे, यासाठी शुक्रवारी पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक बोलावली असल्याचेही कदम यांनी स्पष्ट केले.
क्षणात होत्याचे नव्हते..
गेल्या चार दिवसांपासून त्या ठिकाणी प्रचंड पाऊस कोसळत होता.. डोंगर उतारावरच असल्याने गावातील लोकांनाही या कोसळत्या जलधारा सवयीच्या. मात्र बुधवारच्या दिवशी त्यांच्यासाठी या जलधारा काळ बनूनच आल्या. पावसाच्या मुसळधारांनी डोंगरच फोडला आणि त्याची भलीमोठी दरड गावावर लोटून दिली.. क्षणार्धात त्या दगड-मातीने अख्ख्या गावाचा घास घेतला.. ‘माळीण, ता. आंबेगाव, जि. पुणे’ हा या गावाचा
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा