पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे लढा देत आहे. राज्यभरात दौरे सुरू असून आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा समाज बांधवांची काय भूमिका काय असणार याबाबत मनोज जरांगे पाटील हे बैठका घेत आहे. त्याच दरम्यान मनोज जरांगे पाटील हे पुणे दौऱ्यावर आले आहेत. त्यावेळी पुणे शहर आणि जिल्ह्यातील समाज बांधवा समवेत मनोज जरांगे पाटील यांनी रात्री बैठक घेतली. त्यामध्ये अनेक मुद्यांवर चर्चा देखील झाली.

त्या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, राज्यातील सर्व मराठा बांधवाची लवकरच अंतरवली सराटी येथे बैठक घेतली जाणार आहे. त्या बैठकीकरीता राज्यभरामधून जवळपास २० ते २२ लाख समाज बांधव येण्याची शक्यता आहे. त्यामध्ये लढायच की पडायचं, हे ठरवलं जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Devendra Fadnavis on Beed Politics
देवेंद्र फडणवीसांचे ‘नवीन बीड’चे आवाहन धनंजय मुंडेंसाठी आणखी एक धक्का आहे का?
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
ABVP opposes Chandrakant Patil demands quality education
चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेला ‘अभाविप’कडून तीव्र विरोध, ‘कॅरी ऑन योजना’ गुणवत्तेसाठी मारक; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सकारात्मक असणे दुर्दैवी
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
Image Of Ajit Pawar
Ajit Pawar : “मी काही साधू संत नाही”, बीडमधून अजित पवार यांचा कोणाला इशारा?
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती
Shatrughan Sinha Campaign for AAP
शत्रुघ्न सिन्हा दिल्लीत ‘आप’चा प्रचार करणार; तृणमूलकडून काँग्रेसला ‘खामोश’ करण्याची रणनीती

आणखी वाचा-वनराज आंदेकर खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड गजाआड; आंदेकर यांची बहीण आणि भाचाही अटकेत

राज्यभरात तुम्ही दौरे करीत आहात, उपोषण केलं पाहिजे की विधानसभा निवडणुक लढवली पाहिजे. नेमकी कार्यकर्त्यांची भावना काय आहेत. त्यावर ते म्हणाले की, समाजाची कोणत्याही बाबतीत तयारी आहे. मी त्यांचा मुलगा आहे. त्यामुळे उपोषणाला विरोध केला जातो. ते विरोध करतात पण मी काहीही चुकीच करीत नाही. समाजातील मुलांच्या कल्याणासाठी लढा देत आहे. या मागील हीच भावना असल्याच त्यांनी सांगितलं.

आता राज्य सरकारला वेळ दिला जाणार आहे का त्या प्रश्नावर ते म्हणाले की, वर्षभर वेळ दिला आहे. आता आणखी किती वेळ द्यायचा, आता ते राहणारच नाही. तर त्यांना वेळ का द्यायचा, ते सरकार राहणारच नाही. किती वेळ हे सरकार ठेवणार, गोरगरीब ओबीसींचे हाल होत आहेत. समाजातील प्रत्येक घटकाचे हाल आहेत. त्यामुळे हे सरकार नेमक काय करीत आहे. असा सवाल उपस्थित करीत ते पुढे म्हणाले की, राज्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक मराठा समाज आहे. या समाजाला अनेक वर्षांपासून वेठीस धरण्याच काम केलं गेलं आहे. त्यामुळे आता किती दिवस सहन करायचे, आता लोक स्वतःच्या मुलांच्या बाजूने उभे राहणार आणि यांना दणादण पाडून टाकणार, आता यांना सोडणार नसल्याच सांगत महायुती सरकारवर त्यांनी टीका केली.

Story img Loader