पिंपरी- चिंचवड शहरातील आकुर्डीत सहा मे रोजी विविध मागण्यांसाठी मराठा आरक्षण एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या मनात आले तर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं त्यांना केंद्रसरकार चा पाठिंबा आहे. आता पुन्हा आम्हाला कोर्टात जायचं नाही म्हणूनच येत्या सहा मे रोजी आम्ही आमचे म्हणणं एल्गार परिषदेच्या माध्यमातून मांडणार आहोत अशी भूमिका मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष सुभाष जावळे यांनी पिंपरीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे.

यावेळी सुभाष जावळे म्हणाले, मराठा समाजाचे आरक्षणासाठी ५८ मूक मोर्चे निघाले. अनेक संघटनांनी काम केले म्हणून हे मोर्चे निघाले. याच संघटना सहा मे रोजी होणाऱ्या मराठा आरक्षण एल्गार परिषदेत सहभागी होणार आहेत. पुढे ते म्हणाले, आरक्षणाबाबत महाराष्ट्र सरकारचा कामचुकारपणा सुरू आहे. ते वेळकाढूपणा करत आहेत. “महाराष्ट्र शासनाची प्रामाणिक इच्छा असेल आणि केंद्राची सोबत असेल तर ते आरक्षण देऊ शकतात” यासाठी वेगळा आयोग नेमण्याची गरज नाही. दोन वेळेस राज्यसरकारशी चर्चा झाली पण योग्य तो तोडगा निघालेला नाही. पुनर्विचार याचीका दाखल करणार होते. तेव्हा सांगत होतो की आमच्याकडील तज्ञ मंडळींचा सल्ला घ्या पण मराठा समाजाला खुश करण्यासाठी राज्यसरकार ने काम केले हे योग्य नाही. आता पुन्हा कोर्टात नको, तो वेळकाढूपणा होईल. केंद्रसरकार पाठीशी आहे. त्यामुळं राज्यसरकार मराठा आरक्षण देऊ शकत. आमचं म्हणणं केवळ ऐकून घेतात पण त्यावर ठोस निर्णय घेत नाहीत. मराठा समाजाच्या आरक्षणावेळी घटना दुरुस्ती आणि न्यायालयाचे घोंगड का येत? असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला.

sharad pawar
शरद पवारांचे एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र; सरकारला इशारा देत म्हणाले…
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
Creation of new police stations to curb rising crime in Pune Pimpri Pune news
पुणे, पिंपरीतील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती; चाकणमधील कार्यक्रमात अजित पवार यांचे सुतोवाच
15 days deadline for installation of CCTV in Government Ashram Schools of Tribal Development Department nashik
आश्रमशाळांना सीसीटीव्हीसाठी १५ दिवसांची मुदत; आदिवासी विकास विभागाचा निर्णय
woman hair salon operator file case against shop owner for threatening in dombivli
डोंबिवलीतील केश कर्तनालयाचा नियमबाह्य ताबा घेणाऱ्या गाळे मालकाविरुध्द गुन्हा
incomplete work of first phase of concreting road complete by may 2025
सिमेंट कॉंक्रीटीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील कामांना मे २०२५ ची मुदत; कामे पूर्ण करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश
traffic route changes in nagpur
नागपूर : ‘लाडक्या बहिणी’च्या सुरक्षेसाठी ‘या’ मार्गांवर राहणार बंदी…
Adivasis march to Vikas Bhavan for Pesa recruitment nashik news
पेसा भरतीसाठी आदिवासींचा विकास भवनावर मोर्चा; सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा सहभाग

मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या

१) मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडवावा.
२) आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नोकर भरती करू नये.
३) अरबी समुद्रातील छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचे काम तात्काळ सुरू करावे.
पंजाबराव देशमुख निर्वाण भत्ता व वस्तीगृहाचा लाभ सरसकट मराठा विद्यार्थ्यांना मिळावा.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून मिळणाऱ्या कर्ज प्रकरणासाठी च्या
जाचकटी रद्द कराव्यात.
६) कोपर्डी प्रकरणातील आरोपींना झालेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी तात्काळ
करावी.
७) मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील आंदोलकावरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत.