लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पावसाने पाठ फिरवल्याने राज्यातील अनेक तालुक्यांमध्ये सध्या दुष्काळ आहे. पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. तर दुसरीकडे, सातत्याने बेरोजगारी, महागाई वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकही आर्थिक संकटात आहे. या स्थितीत जनतेला सवलती आणि आर्थिक मदत देण्याऐवजी एसटी बसच्या तिकीट दरात वाढ करणे जाचक आणि अन्यायकारक आहे. ही दरवाढ सरकारने तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली.

Karnataka Congress differences news in marathi
कर्नाटक काँग्रेसमधील मतभेद उघड ; मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सल्लागाराचा राजीनामा
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
MSRTC on hike in bus fares review in marathi
विश्लेषण : एस.टी. भाडेवाढ अपरिहार्य होती का?
Girish Mahajan On Nashik Guardian Minister
Girish Mahajan : नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत गिरीश महाजनांचं मोठं विधान; म्हणाले, “…म्हणून आम्ही मागणी केली होती”
cm Devendra fadnavis marathi news
Supriya Sule : राज्य सरकारवर खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या…!
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Vasai Virar Municipal Solid Waste Management Project marathi news
‘पैसे नाहीत, असे कसे म्हणता?’, महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Ajit Pawar On MSRTC
Ajit Pawar On MSRTC : एसटीच्या तिकीट दरात वाढ होणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली महत्वाची माहिती

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर एसटी बसच्या तिकीट दरात ७ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून १० टक्के वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयाला विरोध दर्शवत आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दरवाढ मागे घेण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.

आणखी वाचा-जनकल्याणासाठीच मी आणि अजित पवार एकत्र, चंद्रकांत पाटील यांची भूमिका

सध्याच्या दुष्काळाच्या आणि दररोज वाढणाऱ्या महागाईच्या वातावरणात दिवाळी हा सण साजरा कसा करायचा, हा प्रश्न राज्यातील जनतेसमोर आहे. अशा स्थितीत आणि ऐन सणासुदीच्या काळात राज्य सरकारने बसच्या तिकीट दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारचा हा निर्णय अतिशय अन्यायकारक आहे. त्यामुळे सरकारने संवेदनशीलता दाखवून तिकीट दरवाढ करण्याचा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, असे धंगेकर यांनी म्हटले आहे.

Story img Loader