लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पावसाने पाठ फिरवल्याने राज्यातील अनेक तालुक्यांमध्ये सध्या दुष्काळ आहे. पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. तर दुसरीकडे, सातत्याने बेरोजगारी, महागाई वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकही आर्थिक संकटात आहे. या स्थितीत जनतेला सवलती आणि आर्थिक मदत देण्याऐवजी एसटी बसच्या तिकीट दरात वाढ करणे जाचक आणि अन्यायकारक आहे. ही दरवाढ सरकारने तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली.

mahayuti eknath shunde devendra fadanvis ajit pawar
मविआ सत्तेत आल्यास कल्याणकारी योजनांवर गदा; ‘रिपोर्ट कार्ड’च्या प्रकाशनप्रसंगी मुख्यमंत्र्यांचा आरोप
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Sharad Pawar criticism that such rulers have not been seen in the history of the maharshtra state pune print news
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर शरद पवारांनी केली देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी; म्हणाले, “गृहमंत्री एवढ्या सौम्यतेने…”
dhangar reservation issue
आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाज आक्रमक; आंदोलकांनी मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून सुरक्षा जाळीवर मारल्या उड्या
Loksatta anvyarth The petition filed by Karnataka Chief Minister Siddaramaiah was dismissed by the Karnataka High Court
अन्वयार्थ: भूखंड घोटाळ्याची तऱ्हा
the cabinet is angry at the behavior of the officials Mumbai
अधिकाऱ्यांच्या चालढकलीवर मंत्रिमंडळाचा संताप
Guardian Minister Suresh Khades miraj pattern shocked the opposition
पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या ‘मिरज पॅटर्न’ने विरोधकांना धक्का
Jagan Mohan Reddy
नायडूंना खोटे बोलण्याची सवयच, जगन मोहन रेड्डी यांचे मोदींना पत्र; मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर एसटी बसच्या तिकीट दरात ७ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून १० टक्के वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयाला विरोध दर्शवत आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दरवाढ मागे घेण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.

आणखी वाचा-जनकल्याणासाठीच मी आणि अजित पवार एकत्र, चंद्रकांत पाटील यांची भूमिका

सध्याच्या दुष्काळाच्या आणि दररोज वाढणाऱ्या महागाईच्या वातावरणात दिवाळी हा सण साजरा कसा करायचा, हा प्रश्न राज्यातील जनतेसमोर आहे. अशा स्थितीत आणि ऐन सणासुदीच्या काळात राज्य सरकारने बसच्या तिकीट दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारचा हा निर्णय अतिशय अन्यायकारक आहे. त्यामुळे सरकारने संवेदनशीलता दाखवून तिकीट दरवाढ करण्याचा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, असे धंगेकर यांनी म्हटले आहे.