लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : भाजपचेच नेते राज्यघटना बदलाची भाषा करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यघटना बदलणार नाही, आरक्षण रद्द करणार नाही, असे सांगत आहेत. मोदी सर्व प्रकारची ‘गॅरेंटी’ देत असताना त्यांच्या जाहीरनाम्यात राज्यघटनेची ‘गॅरेंटी’ नाही. त्यामुळेच त्यांचा राज्यघटना बदलण्याचा डाव असल्याची टीका माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली.

Controversial statement case High Court orders Thane Magistrate in case against Jitendra Awhad
वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण: जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा नोंदवण्याच्या मागणीचा पुनर्विचार करा,उच्च न्यायालयाचे ठाणे न्यायदंडाधिकाऱ्यांना आदेश
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
CM Siddaramaiah
CM Siddaramaiah : कर्नाटकात का होतेय मुख्यमंत्री बदलाची चर्चा? सिद्धरामय्यांशी निष्ठावान समजल्या जाणाऱ्या ‘या’ नेत्यांची CM पदासाठी चर्चा!
cbi anil Deshmukh marathi news
सीबीआयकडून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह पोलीस उपायुक्त, निवृत्त सहाय्यक आयुक्तांवर गुन्हा
badlapur rape case marathi news
बदलापूर प्रकरणात माध्यम प्रतिनिधींचा आरोपींमध्ये समावेश; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, नोटीसा आल्याने संताप
congress welcomes president Draupadi murmu
राष्ट्रपतींनी संपूर्ण देशाचा आक्रोश व्यक्त करावा! महिला अत्याचारसंबंधी द्रौपदी मुर्मू यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसची अपेक्षा
supreme court on governor marathi news
चतुःसूत्र: राज्यपाल न्यायिक पुनरावलोकनाच्या कक्षेत
Ajit Pawar in trouble again due to controversial statement
वादग्रस्त विधानाने अजित पवार पुन्हा अडचणीत

महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी काँग्रेस भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. राऊत बोलत होते. प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, अनुसूचित जाती-जमातीचे शहराध्यक्ष सुजीत यादव, गौतम वानखेडे, माध्यम समन्वयक राज अंबिके आदी उपस्थित होते.

आणखी वाचा-अवकाळी पावसाचा जोर वाढणार… हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट कुठे?

डॉ. राऊत म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला विघातक वातावरणाकडे घेऊन जात आहेत. विरोधातील आवाज दाबून एक प्रकारची हुकूमशाही देशात चालू आहे. भाजपाने दिलेली चारशेपारची घोषणा देशाचे राज्यघटना बदलण्यासाठीच दिली आहे. संपूर्ण देशात भाजपविरोधी लाट असल्याची जाणीव झाल्यानेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मानसिकता बिघडली आहे. त्यांना पराभवाची मोठी भीती वाटत असल्याचे त्यांच्या वक्तव्यांतून दिसत आहे. लोक बोलत नसले, तरी मतदानातून त्यांचा राग बाहेर पडेल.

राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार यांचे सरकार दलित आणि मागासवर्गीयांचे आरक्षण संपुष्टात आणत आहेत. राज्यातील एससी, एसटी विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठांमध्ये शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाची अट लागू केली. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही, अशी टीका राऊत यांनी केली.

आणखी वाचा-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा दावा; म्हणाले, चार जूननंतर शरद पवार, उद्धव ठाकरे…

पुण्यात ‘सोशल इंजिनीअरिंग’चा प्रयोग

काँग्रेस पक्षाने पुणे लोकसभा मतदार संघात पहिल्यांदाच ओबीसी उमेदवार देऊन ‘सोशल इंजिनीअरिंग’चा प्रयोग केला आहे. सामान्य लोकांच्या प्रश्‍नावर पोटतिडकीने काम करणारा उमेदवार दिल्याने काँग्रेसला पाठिंबा वाढत आहे. पुणेकर मतदार सूज्ञ असल्याने ते योग्य निर्णय घेतील, असे राऊत म्हणाले. पुण्याचे वैभव निर्माण करण्यात कॉंग्रेसचे महत्वपूर्ण योगदान आहे. कॉंग्रेसमुळेच पुण्यात अनेक संस्था, आयटी पार्क उभे राहिले. कॉंग्रेसच्या विकासाच्या दृष्टीमुळेच हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.