पुणे : मोसमी पाऊस रविवारी (२ जून) कर्नाटक, आंध्र प्रदेशात दाखल झाला. पावसाने केरळ, तमिळनाडू पूर्णपणे व्यापले असून, अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि ईशान्य भारतातही मोसमी पावसाची आगेकूच सुरू आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये ३० मे रोजी दाखल झालेला पाऊस शनिवारपर्यंत (१ जून) केरळमध्येच स्थिरावला होता. रविवारी मोसमी वाऱ्यांनी केरळ, तमिळनाडू व्यापून पुढे दक्षिण कर्नाटक आणि दक्षिण आंध्र प्रदेश, त्रिपुरातील काही भाग वगळता संपूर्ण ईशान्य भारत, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात आगेकूच केली. मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असून, पुढील दोन-तीन दिवसांत मोसमी पाऊस उर्वरीत कर्नाटक व्यापून आणखी पुढे वाटचाल करेल, असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Heavy rain Mumbai, rain Mumbai, rain mumbai news,
मुंबईत पावसाने जोर धरला, पहाटेपासून अनेक भागांत संततधार
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
Constitution of India
संविधानभान: केंद्रशासित प्रदेशांची व्यवस्था
13 states of the country have the highest number of complaints of atrocity crime news
देशातील १३ राज्यांत अॅट्रॉसिटीच्या सर्वाधिक तक्रारी; उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात सर्वाधिक प्रकरणे
Maharashtra Rain Alert
Maharashtra Rain : कोकण, मराठवाडा, विदर्भात मुसळधारेचा अंदाज; जाणून घ्या, कोणत्या जिल्ह्यांत कसा पाऊस पडणार
illegal weapons smuggling in border areas of Buldhana district and Madhya Pradesh
बुलढाणा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात शस्त्र तस्करी उघड
Intensity of low pressure area persists over Bay of Bengal
बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची तीव्रता कायम
Earthquake in pakistan
Earthquake in Pakistan : पाकिस्तानच्या करोरमध्ये भूकंप; अफगाणिस्तानसह दिल्ली, पंजाबपर्यंत जाणवले धक्के!

हेही वाचा >>>बारावीनंतरच्या डीएल.एड. अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया जाहीर, पहिली गुणवत्ता यादी कधी?

राज्यभरातील तापमानात घट

विदर्भासह राज्यभरातील तापमानात घट झाली आहे. यवतमाळचा अपवाद वगळता विदर्भात रविवारी पारा सरासरी ४२ अंशांवर राहिला. रविवारी यवतमाळमध्ये राज्यात सर्वाधिक ४५.०, वाशिममध्ये ४२.६, नागपूरमध्ये ४१.८, चंद्रपुरात ४३.४, अमरावतीत ४२.६ आणि अकोल्यात ४२.८ अंश सेल्सिअस तापमान होते. मराठवाड्यात परभणी ४०.५, धाराशिव ३९.४, नांदेड ४१.२ आणि औरंगाबादमध्ये पारा ३९.५ अंशांवर होता. मध्य महाराष्ट्रात सोलापूर ४०.६, जळगाव ४०.८, मालेगाव ४२.४ आणि पुण्यात ३६.६ अंश होते. किनारपट्टीवर कुलाब्यात ३५.२ आणि रत्नागिरीत ३४.८ अंश सेल्सिअस तापमान होते.