पुणे: मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासंदर्भात मनोर जरांगे पाटील यांनी दोन महिन्यांची मुदत देत मोठेपणा दाखविला आहे. राज्यातील तिघाडी सरकार मात्र तारखांचा घोळ करण्यात व्यस्त आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाशक्ती या तिघाडी सरकारमध्ये आहे का, हा खरा प्रश्न आहे, असा सवाल बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार डेंग्यूने आजारी होते. आरोग्याच्या बाबतीत राजकारण करू नये. त्यांच्या तब्येतीची चैकशी करत आहे, असे सांगत त्यांनी अजित पवार यांचा आजार राजकीय नव्हता, हे स्पष्ट केले.

beed politics Devendra Fadnavis Suresh Dhas pankaja munde dhananjay munde
माध्यमांमध्ये ‘ आवाज’ बनलेल्या सुरेश धस यांच्या पाठिशी देवेंद्र फडणवीस
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
is state currently stopped issuance of birth certificates to track down illegal Bangladeshi citizens
अवैध बांगलादेशी नागरिकांचा शोध सुरू? ‘या’ आदेशाने चर्चेस बळ
veteran actor amol palekar remark in jaipur literature festival 2025
जयपूर साहित्य महोत्सव :सध्या सरकारविरोधात जो बोलतो तो देशद्रोही; अमोल पालेकर यांचे परखड मत
cm Devendra fadnavis marathi news
Supriya Sule : राज्य सरकारवर खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या…!
Why were local elections delayed in the state
राज्यात स्थानिक निवडणुका लांबणीवर का पडल्या? तिसरी बाजी कोणाची? 
one nation one time
One Nation, One Time नक्की आहे तरी काय? सरकारने याचा मसुदा का तयार केला? याचा फायदा काय?
Fraud of pretext of loan approval Pune
पिंपरी: कर्ज मंजुरीच्या बहाण्याने सव्वा कोटीची फसवणूक

चांदणी चैकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आला आहे. उड्डाणपूल उभारण्यात आल्यानंतरही या भागातील समस्या कायम राहिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी चांदणी चैकाला भेट देत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी नगरसेवक सचिन दोडके आणि काका चव्हाण यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा… नवले पुलाजवळ वाहने लावण्यास मनाई

चांदणी चौकातील संपूर्ण प्रकल्पाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणीही सुळे यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री झालेले पाहायला आवडेल, अशी प्रतिक्रिया त्यांच्या आईंनी दिली आहे. यासंदर्भात बोलताना कोणत्या आईला तसे वाटणार नाही, असे सुळे यांनी सांगितले.

सुळे म्हणाल्या की, पाच महिन्यांपूर्वी कांदा प्रश्न पेटणार असल्याचे सांगितले होते. वाणिज्य मंत्री पियुष गोएल यांनी त्याची दखल घेतली नाही. कांद्यावर चाळीस टक्क्यांचा कर चुकीच्या पद्धतीने लावण्यात आला आहे. केंद्रातील आणि राज्यातील सरकार शेतकरी आणि महिला विरोधी आहे.

हेही वाचा… पुणे: गोदाम मालकाचा खून करून अपघाताचा बनाव, गोदामाच्या भाड्यावरुन खून केल्याचे उघड

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची भूमिका घेतली आहे. त्यासासाठी त्यांनी मोठेपणा देत सरकारला दोन महिन्यांचा कालावधी दिला आहे. राज्यातील सरकार मात्र तारखांचा घोळ करून फसवणूक करत आहे. आरक्षण देण्याची इच्छाशक्ती सरकारमध्ये आहे का, हा मूळ प्रश्न आहे. इच्छाशक्ती असेल तर ते आरक्षण देतील, असे सुळे यांनी स्पष्ट केले.

Story img Loader